शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

महामार्गावरील होर्डिंग धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 6:00 AM

महामार्गावरील प्रामुख्याने अर्जुननगर चौकातील लावण्यात आलेल्या या अनधिकृत फलकांमुळे पंचवटीकडून येणारी वाहने अर्जुननगरातून महामार्गावर येणाऱ्या वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. या सर्व प्रकारांमुळे हा विभाग नागरिकांच्या अपघाताची वाट पाहतो काय, असा नागरिकांचा सवाल आहे. किंबहुना बाजार परवाना विभागाद्वारे कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

ठळक मुद्देचौकाचे विद्रुपीकरण : नागरिकांच्या तक्रारी महापालिकेत कचऱ्याच्या पेटीत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महामार्गावरील पंचवटी चौक ते रहाटगाव दरम्यान चौक अनधिकृत फलकांनी बुजले आहेत. त्यामुळे नगरातून महामार्गावर येणाºया नागरिकांना महामार्गावरील वाहन दिसत नाही. परिणामी या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी ही बाब बाजार परवाना विभागाच्या सहायक आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली असतानाही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवावर उठलेल्या या बेकायदेशीर फलकांची दखल आयुक्त घेणार काय, असा नागरिकांचा सवाल आहे.शहर सौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरण करणाऱ्या या चमकोबाजांवर महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाची ‘कृपा’ असल्याने चौकाचौकांचे विद्रुपीकरण झालेले आहे. महापालिकेच्या उत्पन्नाला चुना लावणाऱ्या या होर्डिंगबाबत कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे या बाजार व परवाना विभागावर नियंत्रण कुणाचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.महामार्गावरील प्रामुख्याने अर्जुननगर चौकातील लावण्यात आलेल्या या अनधिकृत फलकांमुळे पंचवटीकडून येणारी वाहने अर्जुननगरातून महामार्गावर येणाऱ्या वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. या सर्व प्रकारांमुळे हा विभाग नागरिकांच्या अपघाताची वाट पाहतो काय, असा नागरिकांचा सवाल आहे. किंबहुना बाजार परवाना विभागाद्वारे कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.वाढदिवस, स्वागत, शुभेच्छा, विकास कामाचे भूमिपूजन, याशिवाय विविध कारणांसाठी बहुतांश नगरसेवकांद्वारे अनधिकृत होर्डिंग लावण्यात धन्यता मानली जाते. या नियमबाह्य कारभाराला चाप लावण्याचे काम महापालिकेच्या बाजार परवाना विभागाचे आहे. मात्र, अर्जुनगर चौकात या राजकीय व्यक्तींनीच अनधिकृत फलक लावले आहे. चौकाचे हे विद्रुपीकरण नागरिकांच्या जिवावर उठले आहे. बाजार व परवाना विभागाचे दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत आहे.दंड व शिक्षेची तरतूद - कारवाई केव्हा?बाजार परवाना विभागाद्वारे महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध कायद्याचे अधिनियम १९९५ अंतर्गत प्रावधान आहे. यात तीन महिन्यांची शिक्षा व दोन हजारांचा दंड किंवा एकाच वेळी दोन्ही प्रकारची शिक्षा अश्ी तरतूद आहे. मात्र, बाजार परवाना विभाग कारवाई करीत नसल्यामुळे चमकोगिरीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. खुद्द अनेक नगरसेवकांचीच फलके चौकांमध्ये अनधिकृतपणे लावलेली आहेत. आयुक्तांनी हा प्रकार गांभीर्याने घेऊन कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग