शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण आम्ही शेतकऱ्यांना विमा देताे, कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: February 14, 2025 20:06 IST

राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे.

अमरावती : भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतो, असे वादग्रस्त वक्तव्य माध्यमांशी बोलताना राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी येथे केले. या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर राज्यात चांगलेच पडसाद उमटले आहे.

ना. कोकाटे जिल्हा कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन व शेतकऱ्यांशी परिसंवाद साधण्यासाठी अमरावतीला आले होते. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पीक विम्यासंदर्भात असे वक्तव्य केले. ते म्हणाले एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही. भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतो. त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आहे. अन्य राज्यातील लोकांनी यामध्ये अर्ज केले.

याबाबत चौकशी केली असताना लक्षात आल्याने चार लाख अर्ज रद्द करण्यात आले. कुठे तरी सीएससी केंद्रवाले असे काही उद्योग करीत असावे, असा माझा संशय आहे. काही जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे ना. कोकाटे म्हणाले. वक्तव्यादरम्यान कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत केल्याचा आरोप आता विरोधकांद्वारे केल्या जात आहे. त्यामुळे ना. कोकाटे यांचे हे वादग्रस्त वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.जबाबदारीने बोलावे, भाजपचा सल्लाशेतकरी अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उल्लेख आदरानेच व्हायला पाहिजे, असा सल्ला भाजपचे प्रवक्ते प्रवीण दरेकर यांनी कृषिमंत्र्यांना दिला आहे तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते या वक्तव्यावर चांगलेच संतापले, ते म्हणाले शेतकऱ्याला आपण अन्नदाता संबोधतो. त्यांना भिकाऱ्याची उपमा देणे योग्य नाही, सरकार एक रुपयात पीक विमा देते म्हणजे उपकार करते करते का, असा सवाल त्यांनी केला तर लोकभावना दुखावणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांनी कृषिमंत्र्यांना दिला.

शेतकरी हा देशाचा मालक, त्याला भिकारी म्हणायची कृषिमंत्र्यांची हिंमत कशी होते?- काँग्रेस

एक रुपयांमुळे बाहेरच्या कंपन्यांचे गैरप्रकार वाढले. बाहेरच्या कंपन्यांनी त्यामध्ये ऑनलाइन अर्ज भरले. एक रुपयात विमा स्वस्त असल्याने त्या कंपन्यांनी गैरफायदा घेतला. हा गैरफायदा घेऊ नये म्हणून विम्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुनर्विचार करत आहे. त्यामध्ये अभ्यास करून धोरण ठरवू, माझ्या वक्तव्याचा विर्पयास केला गेला.- माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेFarmerशेतकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेस