शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
5
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
6
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
7
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
8
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
9
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
10
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
11
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
12
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
13
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
18
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
19
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
20
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संतुलित योजनेचा फज्जा

By admin | Updated: May 9, 2014 00:58 IST

गावाच्या संपूर्ण विकासासाठी अनेकदा निधीची कमतरता भासते. यावर उपाय म्हणून पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेतून संपूर्ण विकासासाठी भरघोस निधी टप्प्याटप्प्याने दिला जातो.

समित हरकुट ■ चांदूरबाजार
गावाच्या संपूर्ण विकासासाठी अनेकदा निधीची कमतरता भासते. यावर उपाय म्हणून पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेतून संपूर्ण विकासासाठी भरघोस निधी टप्प्याटप्प्याने दिला जातो. मात्र, यंत्रणेतील ग्रामपंचायतींच्या उदासीन धोरणामुळे या योजनेचे बारा वाजले आहेत.
तालुक्यात एकूण १७१ गावे असून २४ गावे उजाड आहेत. १४३ गावे आबाद आहेत. मात्र, पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेच्या तिसर्‍या वर्षी तालुक्यातील एकही गाव पात्र ठरले नाही, ही या तालुक्याची शोकांतिका आहे. तालुक्यात योजनेचा प्रारंभ २00९-१0 मध्ये झाला होता. या योजनेमध्ये पहिल्या वर्षी सहभागी होण्यासाठी गावाची ६0 टक्के करवसुली, गावात ६0 टक्के हागणदारीमुक्ती, लोकसंख्येच्या तुलनेत ५0 टक्के वृक्षलागवड, दुसर्‍या वर्षी ८0 टक्के करवसुली, ८0 टक्के शौचालयांचा वापर, लोकसंख्येच्या तुलनेत ७५ टक्के वृक्षलागवड व घनकचरा व्यवस्थापन तर तिसर्‍या वर्षी ९0 टक्के करवसुली, १00 टक्के शौचालयांचा वापर, १00 टक्के वृक्षलागवड व २ टक्के बायोगॅसचा वापर याप्रमाणे या गावांची योजनेंतर्गत निवड केली जाते.
पात्र गावांना तीनही वर्षी गावातील लोकसंख्येच्या तुलनेत बक्षिसे दिली जातात. या योजनेला प्रारंभ झाला त्यावर्षी म्हणजे २00९-१0 मध्ये तळवेल व वणी या गावांची निवड करण्यात आली होती. वर्ष २0१0-११ यावर्षीसुध्दा बेलोरा, बेसखेडा, बोरगाव मोहना, तुळजापूर गढी व निमखेड या गावांची निवड करण्यात आली होती. वर्ष २0११-१२ मध्येसुध्दा प्रथम वर्षाकरिताच आसेगाव, बेलज, कलडोही व रसुलापूर या गावांची निवड करण्यात आली होती.
तीनही वर्षांमध्ये प्रथम वर्षी एकूण ११ गावांची निवड करण्यात आली. मात्र, या गावांपैकी २ गावे दुसर्‍या वर्षासाठी पात्र ठरली. त्यामध्ये बेलोरा व निमखेडचा समावेश आहे. तर तिसर्‍या वर्षाकरिता एकही गाव योजनेसाठी पात्र ठरले नाही. चालू वर्षासाठी म्हणजे सन २0१३-१४ मध्ये सुध्दा पंचायत समितीने एकूण ९ गावे प्रस्तावित केलेली आहेत. यामध्ये विश्रोळी, सर्फापूर, खरवाडी, निंभोरा, राजुरा, सोनोरी, सर्फाबाद, रतनपूर, गोविंदपूर या गावांची पहिल्या वर्षाकरिता निवड करण्यात आली आहे. या गावांमधू द्वितीय व तृतीय वर्षामध्ये किती गावे पात्र ठरतात, याकडे तालुक्यांचे लक्ष लागले आहे.
योजनेतून गावातील विकास कामांसाठी तीन टप्प्यांमध्ये निधी दिला जातो. स्पर्धात्मक स्वरूपाची ही योजना आहे. प्रत्येक टप्प्यासाठी शासनाकडून निकष घालून देण्यात आले आहेत. या निकषांची पूर्तता केल्यास गावात भरघोस विकास निधी उपलब्ध होऊ शकतो. असे असतानाही तालुक्यातील ग्रामपंचायतींची उदासीनता डोळ्यात खुपणारी आहे. या योजनेचे महत्त्व ग्रामीण जनतेला पटवून देण्यात अद्यापपावेतो यंत्रणेला यश आलेले नाहीत.
पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद