शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे तिकीट दलालांची बल्ले-बल्ले

By admin | Updated: October 25, 2014 02:04 IST

दिवाळी सण साजरा करण्यासाठी घरी आलेल्यांना परत जाण्यासाठी रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे.

अमरावती : दिवाळी सण साजरा करण्यासाठी घरी आलेल्यांना परत जाण्यासाठी रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे. रेल्वे आरक्षण खिडक्यांवर २० नोंव्हेबरपर्यत ‘नो-रुम’ झळकत असल्यामुळे अनेकांनी रेल्वे गाड्यांच्या आरक्षणासाठी दलालांशी संपर्क साधला आहे. मात्र पुणे, मुंबईसाठी चक्क एक हजार रुपयांच्या तिकीटाकरीता पाच हजार रुपये घेतले जात असल्यामुळे अनेकांच्या उत्सवावर विरजण आले आहे. सुट्या संपताच परत जाणे आवश्यक असल्यामुळे अनेकांनी रेल्वे तिकीट विक्री करणाऱ्या दलालांची मागणी पूर्ण करण्याची तयारी दर्शविली आहे.अमरावती रेल्वे स्थानकावरील रेल्वे आरक्षण खिडक्यांवर दलालांचा सुळसुळाट ही नित्याचीच बाब असताना हा प्रकार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलही हतबल झाले आहे. तिकीटांची विक्री करणाऱ्या दलालांचे थेट रेल्वे अधिकाऱ्यांशी संबंध असल्यामुळे त्यांची आरक्षण खिडक्यावर चलती आहे. आदल्या दिवसाच्या तिकीटांसाठी रात्री १२ वाजेपासूनच दलालांची माणसे रांगेत उभी राहतात. त्यामुळे सामान्य व्यक्ती रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळविण्यास येताच त्याला सकाळी आठ वाजताच ५० ते ६० जणांची रांग लागलेली आढळून येते. हा प्रकार दिवाळी उत्सवापुरताच नसून दलालांची माणसे नेहमीच रांगेत लागलेली राहतात, हे वास्तव आहे. अमरावती रेल्वे स्थानकावर तिकीटांचा काळा बाजार करण्यासाठी चांदुर रेल्वे, धामणगाव, बडनेरा व अमरावती येथील दलालांची माणसे रांगते उभी राहत असल्याची माहिती आहे. सामान्य व्यक्तीला रेल्वे गाड्यांचे आरक्षण नाही, मात्र रेल्वे तिकीटांची चढ्या दरात विक्री करणाऱ्याला प्राधान्य असे चित्र हल्ली रेल्वे आरक्षण खिडक्यावर आहे. दिवाळीचे औचित्य साधून मागील दोन महिन्यापूर्वीच रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या अनेक दलालांनी तिकीटांचे आरक्षण करुन ठेवले आहे. हे रेल्वे गाड्यांच्या तिकीटांचे आरक्षण आता अव्वाच्या सव्वा दरात विक्री केले जात आहे. विशेषत: पुणे, मुंबईच्या आरक्षण तिकीटांना हजारो रुपये मोजले जात आहे. रेल्वेचा प्रवास सुखकर म्हणून अनेक जण रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेल त्या दरात खरेदी करण्याची तयारी दर्शवित असल्यामुळे दलालांनी तिकीटांचे दर वाढविले आहे.मुंबई, पुणेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यत आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे आॅक्टोंबरमध्ये मिळणाऱ्या रेल्वे आरक्षण तिकीटांसाठी दलालांच्या मर्जीनुसार रक्कम मोजली जात आहे. एकिकडे प्रवाशांची आर्थिक लूट चालली असताना रेल्वे प्रशासन मूकपणे हे सर्व बघत आहे. या प्रकाराला रेल्वे प्रशासन जबाबदार असून रेल्वे पोलिसांचे दलालांशी लागेबांधे आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीच योग्य दखल घेण्याची मागणी प्रवासीवर्गाकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)