शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बँका बंद, शेतकरी वेठीला

By admin | Updated: May 19, 2015 00:40 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे, शेती मशागत, पेरणीपूर्व कामे, बी-बियाणे-खते यांची लगबग सुरू झाली आहे.

खरीप हंगाम तोंडावर : उलाढाल थांबली, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीअमरावती : खरीप हंगाम तोंडावर आला आहे, शेती मशागत, पेरणीपूर्व कामे, बी-बियाणे-खते यांची लगबग सुरू झाली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांची खरीप पीक कर्जाची धावपळ सुरू होते. यंदा मात्र नापिकीमुळे प्रचंड आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी बँक कर्मचाऱ्यांचा संप व व्यवस्थापनाची ताठर भूमिका यामुळे वेठीला धरल्या जात आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांचे कामकाज तब्बल आठ दिवसापासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. मागील २०१४-१५ च्या हंगामात ५० पैस्याच्या आत जिल्ह्याची पैसेवारी असल्याने शासनाने टंचाई स्थिती जाहिर केली. जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना ४३४९४ लाख रूपयांचे कर्जवाटप केले होते.दुष्काळी परिस्थितीमुळे या कर्जाचे तीन वर्षात समान हप्त्यात पुनर्गठन करून नव्याने खरीपाचे पीक कर्ज द्यावे असे शासनाचे आदेश आहेत. खरीपाच्या पीक कर्जावरील तीन महिन्याचे व्याज शासनाद्वारा शेतकऱ्यांना माफ करण्यात आले. यंदाच्या हंगामात खरीपाचे पीक कर्जाची प्रक्रिया बँकेचे कामकाज बंद असल्यामुळे रखडली आहे. २०१५-१६ च्या खरीप-रबी हंगामासाठी जिल्हा बँकेला दिले आहे. बँकेला कर्ज वाटपासाठी कोरडवाहू कापसाला दर हेक्टरी ३५ ते ४४ हजारापर्यंत पीक कर्जदर जिल्हा तांत्रिक गट समितीने मंजूर केले आहे.बागायती कापसाकरिता ४० ते ४९ हजार, संकरीत ज्वार १९ ते २२ हजार, तूर २४ ते २६ हजार, सोयाबीन ३० ते ३५ हजार, मूग २० ते २४ हजार, उडीद २० ते २४ हजार असे दर निश्चित केले आहे. जिल्हा बँकेने १५ एप्रिल २०१५ पर्यंत २५ हजार ९७१ शेतकऱ्यांना २ कोटी १८ लाख ८५ हजाराचे वाटप केले आहे. खरे तर शेतकऱ्यांच्या खरीप पीक कर्जाची सुरुवात मे अखेरपासून सुरू होते. यंदा मात्र शेतकऱ्यांच्या बँकेने त्यांना वेठीस धरले आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांना दिलगिरी, भूमिका मात्र ताठरचजिल्हा बँक कर्मचाऱ्यांचा ११ मे पासून संप सुरू आहे, आठ दिवस झाले सर्व कामांचे कामकाज ठप्प, संघटना मागे हटायला तयार नाही, बँकेचे व्यवस्थापन तडजोडीस तयार नाही, दोन्ही बाजूंच्या भूमिका ताठरच आहे. यामध्ये शेतकरी, शिक्षक, ठेवीदार पिचल्या जात आहे. एक मात्र या दोन्ही बाजूकडून होते ती म्हणजे शेतकऱ्यांची दिलगिरी. जिल्हा बँकेत व्यवस्थापनाची मंगळवारी बैठक होत आहे. याविषयीच्या सूचना त्यांना दिल्या आहे. संपाविषयी या बैठकीत चर्चा होईल. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना त्वरीत पीक कर्ज द्यावे अशा सूचना सोमवारच्या बैठकीत दिल्या आहेत. - गौतम वालदेजिल्हा उपनिबंधक(सहकारी संस्था)