शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

थेंबभर पाण्यासाठी पशू-पक्ष्यांची आर्त हाक !

By admin | Updated: April 3, 2017 00:12 IST

विदर्भातला उन्हाळा म्हणजे जीवाची काहिली करणारा. डोईवर प्रखर तापणारा सूर्य. आसपास दाहक वातावरण, निष्पर्ण होत चाललेले वृक्ष, कोरडे पडत चाललेले जलसाठे......

जलसाठे होताहेत कोरडे : सिमेंटच्या जंगलात वन्यजीवांची तगमग, जनजागृतीची गरजअमरावती : विदर्भातला उन्हाळा म्हणजे जीवाची काहिली करणारा. डोईवर प्रखर तापणारा सूर्य. आसपास दाहक वातावरण, निष्पर्ण होत चाललेले वृक्ष, कोरडे पडत चाललेले जलसाठे..या सगळ्यांचा परिणाम संपूर्ण सृष्टीवर जाणवतेय. मग, इवल्या-इवल्या पक्ष्यांची आणि प्राण्यांची कथा ती काय, सिमेंटच्या जंगलात थेंबभर पाण्यासाठी तगमगणारे पक्षी आणि पाण्याच्या एका घोटासाठी भरकटणारे पशू पाहिले की अंगावर सर्रकन काटा येतो. पशू-पक्ष्यांनी पाण्यासाठी दिलेली मूक आर्त हाक मनुष्यांपर्यंत पोहोचणे खरे गरजेचे आहे. शहरीकरणासाठी सर्रास वृक्षांच्या कत्तली झाल्यात. सगळीकडे सिमेंटची जंगले उभी राहिलीत. पक्ष्यांचा हक्काचा निवाराच हरवला. जी काही मोजकी झाडे आहेत, ती तप्त उन्हामुळे निष्पर्ण झाली आहेत. कमालीच्या तापमानामुळे मनुष्याच्याच जीवाची काहिली होत असताना बिचाऱ्या मूक पशू-पक्ष्यांचे काय होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. पशू-पक्ष्यांना जगण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. मानव भौतिक सुखांच्या मागे लागला आहे. जगणे डिजिटल झाले आहे. सिमेंटचे जंगल वेगाने फोफावत आहे. मात्र, यामुळे निसर्गाचे संतुलन वेगाने ढासळतेय. पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने हवामानाचे तंत्रही बिघडले आहे. पशू-पक्षी नामशेष होताहेत. निसर्गाचे संतुलन तोलण्याची मोठी जबाबदारी पार पाडणारे पशू-पक्षी जगण्यासाठी धडपडत आहे. मात्र, दग्ध उन्हाळ्यात पाण्याच्या थेंबासाठी अनेक पक्ष्यांचे जीव जातात. पशू मृत्युमुखी पडतात. काही वर्षांपूर्वी पशू-पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती अस्तित्वात असल्याने त्यांच्या किलबिलाटाने मन प्रसन्न होत असे. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. याचाच परिणाम म्हणून शासनाला पशू-पक्ष्यांच्या संवर्धनासाठी विशेष दिवस साजरे करावे लागत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या ‘चिमणी दिना’ला शाळा, महविद्यालयीन विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. पक्ष्यांना दाणा-पाणी देऊन हा दिवस साजरा करण्यात आला. मात्र, निसर्गाचे हे धन खरेच जपायचे असेल तर पशू-पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय समाजातील प्रत्येक घटकाने आवर्जुन करावी. केवळ दिन साजरा करण्यापुरते याचे महत्त्व राहू नये. यासाठी समाजजागृती करणे महत्वाचे आहे. वन्यजीवांचे संवर्धन करण्यासाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत असले तरी अधिकाऱ्यांच्या वातानुकूलित दालनात होणारे निर्णय हे खऱ्या अर्थाने मुक्या पशू-पक्ष्यांसाठी लाभदायक ठरणारे आहेत काय, हा संशोधनाचा विषय आहे. भावी पिढीला चिमणी, कावळा यांसारख्या पक्ष्यांची ओळख केवळ पुस्तकातून करून द्यावी लागणार नसेल तर या पशू-पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आवर्जून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. आता यासाठी खऱ्या अर्थाने जनजागृती करण्याची वेळ आली आहे. स्वत:पासून याची सुरुवात करायला हरकत नाही. पक्षीप्रेमींनी पुढाकार घ्यावा हल्ली उन्हामुळे जीवाची काहिली होत असताना पाण्यासाठी पशू-पक्ष्यांची त्राही होत आहे. त्यामुळे पक्षिप्रेमींनी त्यांच्या संगोपणासाठी पुढाकार घ्यावा. शक्यतो घराच्या आसपास मातीच्या पात्रात पाणी व काही धान्य ठेवावे. बगिच्यात किंवा जेथे अधिक झाडे असतील अशा ठिकाणी टाकाऊ वस्तूपासून निर्मित केलेले जलपात्र टांगून ठेवावे. यात पाणी व धान्य राहील अशी सोय करावी. बाजारात सहजपणे अशी पात्रे उपलब्ध आहे. गरज आहे ती पक्षी जगविण्याची. जंगलातील जलसाठ्यात पाणी असावे, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक पाणवठ्यांचे स्त्रोत, सोलरवरील हातपंप आदींचा वापर केला जात आहे. पशू, पक्ष्यांचे जीव वाचविणे हे वनविभागाचे कर्तव्य आहे.- हेमंत मीणा, उपवनसंरक्षक, अमरावती