शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘अवकाळी’च्या तडाख्यात २६ गावांत ४४८ हेक्टरवरील गव्हाचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 11:22 IST

२६ गावांत ४४८ हेक्टरवरील गहू पिकाचे नुकसान झाले आहे.

अकोला : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात रविवारी जिल्ह्यातील बार्शीटाकळी आणि पातूर या दोन तालुक्यांत २६ गावांमध्ये ४४८ हेक्टरवरील गहू पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोमवारी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला.
जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत रविवार, १ मार्च रोजी रात्री वादळी वाºयासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. अवकाळी पावसाच्या तडाख्यात रब्बी हंगामातील गहू, काढणीला आलेला हरभरा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढणीला व कापणीला आलेल्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने, शेतकरी हवालदिल झाला. जिल्ह्यातील बार्शीटाकळी व पातूर तालुक्यातील पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांमार्फत सोमवार, २ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार दोन्ही तालुक्यातील २६ गावांत ४४८ हेक्टरवरील गहू पिकाचे नुकसान झाले आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील बार्शीटाकळी व पातूर या दोन तालुक्यातील पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल २ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला.


पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश!
अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील बार्शीटाकळी व पातूर या दोन तालुक्यात २६ गावांमध्ये गहू पिकाचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानाचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून, दोन्ही तालुक्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरBarshitakliबार्शिटाकळीFarmerशेतकरीagricultureशेती