शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

व्याजमाफीच्या आदेशाला बँकांची हरताळ

By admin | Updated: July 21, 2014 00:43 IST

शेतकर्‍यांकडून होत आहे व्याजासह कर्जवसुली

बोरगाव वैराळे : गतवर्षी अतवृष्टी व गारपिटीने अकोला जिल्हय़ातील शेतकरी गारद झाल्याने शासनाने डिसेंबर २0१४ पर्यंत शेतकर्‍यांच्या पीक कर्जावरील व्याजमाफी जाहीर केली आहे; परंतु काही बँका व्याजमाफीच्या आदेशांना हरताळ फासून शेतकर्‍यांकडून व्याजासह कर्ज वसूल करीत असल्याने बोरगाव वैराळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे, सोनाळा, हातरूण, अंदुरा या परिसरातील गावांना गत पाच वर्षांपासून मोर्णा व पूर्णा नदीच्या पुरांचा फटका बसत आहे. त्यातच गतवर्षी खरीप हंगामात झालेलीअतवृष्टी व त्यानंतर रब्बी हंगामात झालेली गारपीट यामुळे परिसरातील शेतकरी गारद झाला. नुकसानीचा सर्व्हे करण्यात आला; परंतु मदत अजूनही मिळाली नाही. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने डिसेंबर २0१४ पर्यंत व्याज माफी जाहीर केली. त्यामुळे शेतकरी जुळवाजुळव करून गतवर्षीच्या पीक कर्जाची मूळ रक्कम फेडण्यासाठी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक व राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जात आहेत. परंतु, या बँका शेतकर्‍यांकडून १0 टक्के व्याजासह कर्ज वसुली करीत आहेत. त्यामुळे शासनाच्या व्याजमाफीच्या घोषणेला बँका हरताळ फासत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.
यासंदर्भात अ.जि.म.स. बँकेचे निरीक्षक तायडे यांच्याकडून माहिती घेतली असता, ज्या शेतकर्‍यांनी रब्बीसाठी पीक कर्ज वाटप झाले आहे व ज्यांच्या रब्बी पिकांचे ५0 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे व हे नुकसान केवळ गारपिटीमुळेच झाले असेल, अशाच शेतकर्‍यांना व्याजमाफीची सवलत असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, बँक व शासनाच्या व्याज माफीच्या या अजब निकषांबाबत शेतकर्‍यांमध्ये संभ्रम असून, शासनाने सरसकट सर्वांनाच व्याजमाफी द्यायला हवी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.