शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ३६२ गावे करणार हागणदारीमुक्त

By admin | Updated: June 24, 2016 01:17 IST

राहुरी : अहमदनगर जिल्ह्यात शौचालय बांधकामाने गती घेतली असून सर्वांच्या सहकार्याने यंदा ३६२ गावे हागणदारीमुक्त करण्यात येणार आहेत

राहुरी : अहमदनगर जिल्ह्यात शौचालय बांधकामाने गती घेतली असून सर्वांच्या सहकार्याने यंदा ३६२ गावे हागणदारीमुक्त करण्यात येणार आहेत. याशिवाय सांडपाणीमुक्त गाव मोहिमेला बळकटी देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सभापती मंजुषा गुंड यांनी केले.जिल्ह्यातील ३६२ गावांतील सरपंच, ग्रामसेवक व स्वच्छतादूत यांची स्वच्छता मिशन कार्यशाळा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात झाली. त्यावेळी गुंड बोलत होत्या. प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक व स्वच्छतादूत यांनी समन्वयाने काम करावे,आमचा गाव, आमचा विकास हे ब्रीद डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यास यश मिळेल़ मागील वर्षी ५५ हजार शौचालये बांधण्यात आली़ त्यात आता वाढ करण्यात येणार आहे. प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके यांनी केले़ जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले़गणेश शिंदे यांनी अभियानाचे महत्व विशद केले़ महिला व बालकल्याण सभापती मीरा चकोर, कृ षी विभागाचे सभापती शरद नवले यांची भाषणे झाली़ कार्यक्रमास बांधकाम सभापती दिघे, राहुरी पंचायत समितीच्या सभापती मंगल निमसे, गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे आदी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)