शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

वणी तालुक्यातील विदर्भा नदीचे खोरे झाले विषाक्त

By admin | Updated: November 16, 2016 00:37 IST

तालुक्यातील घोन्सा येथून बारमाही वाहणाऱ्या विदर्भा नदीत लगतच्या कुंभारखणी कोळसा खाणीतून निघणारे दूषित पाणी सोडण्यात येत आहे.

वेकोलिची मुजोरी : घोन्सासह परिसरातील नदीकाठावरील गावांना होतोय रसायनयुक्त पाण्याचा पुरवठावणी : तालुक्यातील घोन्सा येथून बारमाही वाहणाऱ्या विदर्भा नदीत लगतच्या कुंभारखणी कोळसा खाणीतून निघणारे दूषित पाणी सोडण्यात येत आहे. या दूषित पाण्यामुळे तालुक्यातील विदर्भा नदीचे खोरे विषाक्त झाले आहे. सोबतच कोळसा खाणीतून सोडण्यात येणाऱ्या या रसायनयुक्त पाण्याचा नदीकाठावरील गावांना पुरवठा होत असल्यामुळे एखाद्याला जीव गमावण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील घोन्सा लगत गेल्या १२ वर्षांपूर्वी कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीची निर्मिती करण्यात आली. तेव्हा कोळसा काढताना निघणारे रसायनयुक्त व दूषित पाणी विदर्भा नदीत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु हे पाणी शुद्ध करून सोडण्यात यावे, या अटीवर ग्रामपंचायतीने नदीत पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या. सुरूवातीला काही वर्ष वेकोलिने पाणी शुद्ध करून नदीत सोडले. मात्र आता गेल्या वर्षभरापासून पुन्हा वेकोलि प्रशासनाने रसयानयुक्त व दुषित पाणी सोडणे सुरू केले आहे. दुपारी हे पाणी सोडताना ग्रामस्थांच्या दृष्टीस पडेल म्हणून वेकोलि प्रशासनातर्फे रात्रीच्या वेळेला पाणी सोडण्यात येत आहे. याबाबत गेल्या तीन वर्षांपूर्वी प्रयोगशाळा तंत्रज्ञाने पाण्याचे नमूने घेतले होते. तसेच हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवालसुद्धा वेकोलि व ग्रामपंचायत प्रशासनाला दिला होता. त्यामुळे वेकोलिने पुन्हा काही दिवस पाणी शुद्ध करून नदीत सोडणे सुरू केले. या पाण्यामुळे नदीच्या जलस्त्रोत वाढसुद्धा झाली होती. परंतु आता पुन्हा वेकोलि प्रशासनातर्फे ग्रामस्थांच्या डोळ्यात धुळ फेकत रसायनयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात आहे. परिणामी घोन्सावासीयांसह परिसरातील गावकऱ्यांना हे रसायनयुक्त व दूषित पाणी प्यावे लागत आहे. तसेच याच विदर्भा नदीतून परिसरातील नदीकाठावरील गावांना नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे त्यांचेही आरोग्य धोक्यात सापडले आहे. या पाण्यामुळे जर एखाद्याला जीव गमवावा लागला, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र वेकोलि प्रशासन आपले मुजोरी धोरण सुधारण्यास अद्यापही तयार नाही. गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी घोन्सा ग्रामपंचायतीने पाण्याचा जलस्त्रोत वाढावा, या उद्देशाने लोकसहभागातून या नदीची साफसफाई करून खोलीकरण केले होते. मात्र या दूषित पाण्यामुळे संपूर्ण नदी आता काळीभोर झाली आहे. त्याचबरोबर या नदीत काही जनावरेसुद्धा पाणी पित असून त्यांचेही आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच आता या प्रकरणाची चौकशी करून वेकोलिविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. वेकोलिने केली ग्रामपंचायतीची दिशाभूलगेल्यावर्षी वेकोलिने वाढीव क्षेत्रासाठी घोन्सा येथील ग्रामपंचायतीकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र घेऊन आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ना हरकत प्रमाणपत्र मिळताच वेकोलिने आश्वासनाकडे पाठ फिरविली आहे. गावात सुरू असलेले पाण्याच्या टाकीचे काम गेल्या वर्षभरपासून रेंगाळले आहे. तसेच पथदिवे व रस्त्याची समस्या अद्यापही कायम आहे. याबाबत एब एरिया मॅनेजर ढोले यांच्यासोबत उपसरपंच अनिल साळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप काकडे, सरपंच निरूपमा पथाडे, पांडुरंग निकोडे, अनंता कामकटकर व ग्रामपंचायत सदस्यांनी एक तास चर्चा करून मागण्या सोडविण्याची विनंती केली होती. मात्र एक महिन्याच्या कालावधी लोटूनही वेकोलिने आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे वेकोलिने ग्रामपंचायतीची दिशाभूल केल्याचा आरोप उपसरपंच अनिल साळवे यांनी केला आहे.