शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

६८२ गावात पाणीटंचाईची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील ६८२ गावात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. ही टंचाई निवारण्यासाठी ...

ठळक मुद्देनऊ कोटींचा कृती आराखडा : ७०६ उपाय योजनांसाठी तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ६८२ गावात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. ही टंचाई निवारण्यासाठी नऊ कोटींच्या कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या निधीमधून ७०६ उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.यावर्षी बरसलेला पाऊस अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. बरसलेला हा पाऊस जमिनीत पाहिजे तसा मुरलाच नाही. परिणामी येत्या उन्हाळ्यात पुन्हा भीषण टंचाई निर्माण होणार आहे.भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ६८२ गावामध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. याकरिता ७०६ उपाययोजना जिल्हा प्रशासनाला कराव्या लागणार आहे. त्याकरिता नऊ कोटी १२ लाख रूपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.जिल्ह्यात १४ तात्पुरत्या पुरक नळ योजना, २४ नळ योजनांची विशेष दुरूस्ती, ४७५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागणार आहे. ३६ गावामध्ये टँकर आणि बैलगाडीच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासह विविध उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी हा राखीव निधी खर्ची घातला जाणार आहे. पाणीटंचाईच्या काळात स्थानिक स्तरावरून काही प्रस्ताव आल्यास त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.कोट्यवधीच्या खर्चानंतरही टंचाईपाणीटंचाईचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघावा म्हणून जलयुक्त शिवार योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून पाटसऱ्या, शेततळे, माथा ते पायथा, बांध बंदिस्ती या सारख्या विविध उपाययोजना करण्यात आल्या. यावर कोट्यवधीचा खर्च झाला. यानंतरही जिल्ह्यात पाणीटंचाई कायमच आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई