शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण व आरोग्यतून फुलतेय ‘मनोहारी’ स्वप्न

By admin | Updated: May 17, 2014 23:54 IST

गेली अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या पदाचा उपयोग स्वविकासासाठी केला जात आहे. कालपर्यंत नेत्यांचे उंबरठे झिझवणार्‍याला आता

यवतमाळ : गेली अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या पदाचा उपयोग स्वविकासासाठी केला जात आहे. कालपर्यंत नेत्यांचे उंबरठे झिझवणार्‍याला आता वातानुकुलीत जीवनशैलीचे डोहाळे लागले आहे. अडीच वर्षात बर्‍याच बाबतीत नेत्रदीपक प्रगती घडून आली आहे. आपले मनोहारी स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही विभागाचा बोजवारा उडवला जात आहे. सत्तेसोबत सुबत्ता हे समीकरण ठरलेलेच आहे. यापूर्वीही जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्यतून अनेकांनी चांगली गंगाजळी गोळा केली आहे. येथे होणार्‍या पुरवठ्यातून मिळणारे कमीशन आणि शिक्षण विभागातील पदोन्नती, बदल्या, निलंबितांची पुनर्नियुक्ती हे सर्व मार्ग आर्थिक सुबत्ता ेदेणारेच आहे. येथे प्रत्येक गोष्ट व्यवस्था सुधरण्याऐवजी व्यवस्थित राहण्यासाठीच केली जाते, हे आजपर्यंतच्या लेख्याजोख्यावरून दिसून येते. या विभागातून सुरू असलेल्या नसत्या उठाठेवीला लगाम घालण्यासाठी शिवसेनेकडून टोकाची भूमिका घेण्यात आली. मात्र परिस्थिती आली की, कुणाचेही पाय पकडण्याची कसब अंगी असल्याने केवळ किरकोळ जखमा झेलून हे प्रकरण निस्तारले. सत्तेतून सुबत्ता मिळविण्याच्या नादात संघटनेतील ‘मधू’नेही हातभार लावायला सुरुवात केली. मुंबई वारी आणि ग्रामविकासातील संबंधाची सांगड घालत बँकॉक वारीचा योग घडवून आणला. ३४६ निमशिक्षकांना नियमित करण्याच्या प्रक्रियेसाठी प्रत्येकी दहा हजारांची खिरापतही गोळा झाल्याची चर्चा शिक्षण विभागाच्या वर्तुळात आहे. यातूनच अनेक दिवसांपासून उराशी असलेले विदेश वारीचे स्वप्न साकारण्याचा बेत ठरला. जिल्ह्यात साथीच्या आजाराचा उद्रेक झाला आहे. भर उन्हाळ्यात डेंग्यू व डायरियाने ग्रामीण भागात दहशत निर्माण केली आहे. अशा स्थितीत जबाबदारी स्वीकारण्याऐवजी आपल्या स्वप्नपूर्तीचा बेत आखण्यात आला. खूश मस्करीसाठी आपल्या लेखण्या झिजवणार्‍यांचीही संगत स्वप्नपूर्तीसाठी मिळाली. दिवसभर गावात फिरून आपले व्रत सांभाळण्यापेक्षा हितसंबंध जोपासून तुंबड्या भरणार्‍यांनीही आपली इच्छा बोलून दाखविली. अ‍ॅन्टी चेंबरच्या बंदद्वार बैठकीत पाच मे रोजीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. शिक्षण आदर्शातून घडतं. मात्र आता शिक्षणाचा आदर्शच बिघडल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)