शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

टॉवरच्या नावाखाली भरघोस आमिषे

By admin | Updated: October 26, 2015 02:25 IST

गावात मोबाईल सेवा सुरू करण्याकरिता टॉवर उभारणे सुरू असून त्याकरिता जागा भाड्याने घ्यायची आहे.

गावकऱ्यांनो सावधान : कंपनीकडून सरपंचांना आले पत्र, नोकरीचीही फसवी हमीअकोलाबाजार : गावात मोबाईल सेवा सुरू करण्याकरिता टॉवर उभारणे सुरू असून त्याकरिता जागा भाड्याने घ्यायची आहे. याकरिता मोबाईल टॉवरच्या कंपनीकडून भरघोस आमिषे देण्यात येत आहे. जागा मालकाला अर्जासोबत रजिस्ट्रेशन फी कंपनीच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगण्यात येत आहे. कंपनीने दाखविलेल्या भरघोस आमिषाला बळी पडून गावकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील एका मोबाईल टॉवर कंपनीकडून गावाच्या सरपंचाला एक पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रामध्ये भारत सरकारद्वारे एक मोबाईल टॉवर उभारणीकरिता गावात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील काही निवडक गावांमध्ये टॉवर उभारणीकरिता १०० गज जमीन आणि आॅफिसकरिता ५० गज जागेची आवश्यकता आहे. यामध्ये कंपनी जागामालकाला २० लाख रुपये अ‍ॅडव्हान्स व ४० हजार रुपये प्रतिमहिना भाडे देईल आणि कुटुंबातील एका व्यक्तीस टॉवर गार्डची नोकरी देण्यात येईल, त्याची सॅलरी १६ हजार राहील. इच्छूक अर्जदाराने जागेच्या इत्थंभूत माहितीसह कंपनीकडे अर्ज सादर करावा. अर्ज सादर केल्यानंतर १५ दिवसात कंपनी आपल्यासोबत करार करण्याकरिता आपल्याकडे येईल. अशा प्रकारचे मोठमोठे आमिष कंपनीने सरपंचाला पाठविलेल्या माहितीपत्रकामध्ये दाखविले आहे. अशा आमिषाला बळी पडणाऱ्या अर्जदारास रजिस्ट्रेशन फी म्हणून पाच हजार १०० रुपये रोख कंपनीद्वारे सांगण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास आवर्जून पत्रामध्ये लिहण्यात आले आहे. माहितीपत्रकात दर्शविण्यात आलेल्या मोबाईल नंबरवरून खाते नंबर कंपनीकडून अर्जदारास सांगण्यात येईल, अशी सगळी संशयास्पद प्रक्रिया आहे.लहानशा जागेचे २० लाख रुपये अ‍ॅडव्हांस, ४० हजार रुपये मासिक भाडे व १६ हजार रुपये महिन्याची टॉवर गार्डची नोकरी या आमिषाला ग्रामीण भागातील व्यक्ती बळी पडून अर्जासोबत पाच हजार १०० रुपये कंपनीचे खात्यात जमा करेल आणि यामध्ये अनेकांची फसगत होण्याची शक्यता आहे. सदर प्रकारचे पत्र अकोलाबाजार ग्रामपंचायतला प्राप्त झाले असून या आमिषाला कुणीही बळी पडू नये, असे आवाहन सरपंच अर्चना मोगरे यांनी केले आहे. (वार्ताहर)मेहनतीला पर्याय नाहीमोबाईल टॉवर उभारणीचे निमित्त सांगून गावकऱ्यांना गंडा घालण्याची शक्यता आहे. जागेचे भाव बघता, संबंधित पत्रात दिलेली आमिषे फसवी असल्याचे उघडच आहे. इतक्या सहजा सहजी कुणीही भरघोस पैसा देऊ शकत नाही. पैसा मिळवायचा तर मेहनतीला पर्याय नाही, असे आवाहन सुज्ञ नागरिकांनी केले आहे.