शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: July 1, 2017 01:08 IST

अंगणात मोबाईलवर मोठ्याने का बोलतो, या क्षुल्लक कारणावरून शहरातील तेलगू वसाहत आणि नूर कॉलनीतील

तीन गंभीर : २३ जणांवर गुन्हा, १६ जणांना अटक लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : अंगणात मोबाईलवर मोठ्याने का बोलतो, या क्षुल्लक कारणावरून शहरातील तेलगू वसाहत आणि नूर कॉलनीतील दोन गटांत तुंबळ हाणामारी होण्याची घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी २३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यातील १६ जणांना अटक केली. शहरात तणावपूर्व शांतता असून, पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. आशीष कैलास शिंदे (२०), नरेश अल्लडवार (२२), नागनाथ परसोलू (१७) रा.तेलगू वसाहत, पुसद अशी जखमींची नावे आहे. आशीषच्या डोक्यावर धारदार शस्त्राचा वार झाल्याने त्याला नांदेड येथे हलविण्यात आले. येथील तेलगू वसाहतीमधील रहिवासी नरेश अल्लडवार, आशीष शिंदे व नागनाथ परसोलू या तिघांचा मोबाईलवर मोठ्याने का बोलता, असे म्हणत नूर कॉलनीतील काही तरुणांशी वाद झाला. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. नूर कॉलनीतील तरुणांनी लाठीकाठी व धारदार शस्त्राने नरेश, आशीष व नागनाथवर हल्ला चढविला. त्यात हे तिघेही जखमी झाले. घटनेनंतर नूर कॉलनीतील तरुण पसार झाले. ही माहिती शहर पोलिसांना मिळताच ठाणेदार वाघू खिल्लारे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. आशीष शिंदेच्या तक्रारीवरून नूर कॉलनीतील तब्बल ११ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमांसह गुन्हे दाखल केले. याच घटनेचे पडसाद येथील पार्वतीनगर परिसर व वसंतनगरमधील दुर्गा चौकात दिसून आले. येथे काही तरुणांनी घरावर दगडफेक केली, तर काहींनी अंगणात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणात १२ जणांसह इतर ४० जणांविरुद्ध वसंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सात जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून दोन तलवारी जप्त करण्यात पोलिसांना यश आले, तर दुर्गा चौकात नासधूस करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल यांनी सांगितले. घटनेमुळे शहरात तणावपूर्व शांतता असून, सर्व व्यवहार मात्र सुरळीत आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका - पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी शुक्रवारी तातडीने पुसदला भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली. अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. नागरिकांनी अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी येथे पत्रकार परिषदेतून केले. शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून कोंम्बिंग आॅपरेशन व पेट्रोलिंग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उमरखेडमध्ये लवकरच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, तेलगू वसाहतीतील रहिवाशांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून नूर कॉलनीतील तरुणांच्या त्रासाबद्दल माहिती दिली.