शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पूस धरणापाठोपाठ इसापूर धरणातही ५५ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 6:00 AM

पूस धरणात परतीच्या पावसामुळे ८० टक्के जलसाठा निर्माण झाला असून त्याचबरोबर इसापूर धरणातसुद्धा ५५ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात भरपूर पाऊस पडत असल्याने पैनगंगा नदीवर असलेल्या इसापूर धरणात पाण्याचा ओढा चालूच आहे. इसापूर धरण हे मोठे धरण असून यावर विदर्भातील सुमारे १५ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. तसेच मराठवाड्यातील सुमारे ९१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा परिणाम । रबी पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : जूनपूर्वी पूस आणि इसापूर या दोन्ही मोठ्या धरणांमध्ये जलसाठा अत्यल्प उरला होता. त्यामुळे परिसरातील शेतीसिंचनाचा गंभीर प्रश्न उद्भवला होता. मात्री एकीकडे परतीच्या पावसाने खरिपातील पिकांना मोठा फटका दिला असला तरी याच पावसामुळे पूसपाठोपाठ इसापूर धरणातील जलसाठाही वाढला आहे. त्यामुळे किमान रब्बी हंगामातील पीक घेण्याची शेतकऱ्यांची आशा वाढली आहे.पूस धरणात परतीच्या पावसामुळे ८० टक्के जलसाठा निर्माण झाला असून त्याचबरोबर इसापूर धरणातसुद्धा ५५ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात भरपूर पाऊस पडत असल्याने पैनगंगा नदीवर असलेल्या इसापूर धरणात पाण्याचा ओढा चालूच आहे. इसापूर धरण हे मोठे धरण असून यावर विदर्भातील सुमारे १५ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. तसेच मराठवाड्यातील सुमारे ९१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. सुरुवातीच्या पावसाने दगा दिल्यामुळे इसापूर धरणाच्या पातळीने निचांक गाठला होता. परंतु परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने या धरणात प्रचंड प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असल्याने आजमितीस धरणात ५५ टक्के जलसंचय निर्माण झाला आहे. यामुळे रब्बीतील पिकाच्या सिंचनासाठी शेतकरी सुखावला आहे. मातीच्या बांधकामातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील इसापूर धरण हे महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचे प्रमुख धरण असून त्याची संपूर्ण जलाशय पातळी ४४१ मीटर आहे. आजमितीस पाणीपातळी ४३६ मीटर असून यावर्षीच्या कमी पावसाने रब्बीतील पिकांसाठी पाणी मिळणे अवघड असल्याचे वाटत होते. मात्र पावसाळ्याच्या शेवटच्या अंकात पावसाने खरीप पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले असले तरी शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी आशा निर्माण केली आहे.जूनमध्ये होता केवळ मृत जलसाठामागील वर्षी कमी पर्जन्यमानामुळे इसापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा होता. जेमतेमच भरलेल्या या धरणात जून महिन्यापूर्वी केवळ मृत जलसाठाच शिल्लक राहिला होता. मात्र आता परतीच्या पावसाच्या धडाक्याने इसापूर धरणात ५५ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील परिसरातील शेतकºयांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.

टॅग्स :Damधरण