शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार आॅटोरिक्षांना मीटरसक्ती

By admin | Updated: October 9, 2015 00:17 IST

यवतमाळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातील सुमारे १६ हजार आॅटोरिक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी मीटर बंधनकारक केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : प्रवास भाडे आता मीटरनुसारच आकारणारयवतमाळ : यवतमाळ शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातील सुमारे १६ हजार आॅटोरिक्षांना जिल्हाधिकाऱ्यांनी मीटर बंधनकारक केले आहे. विनामीटर आॅटोवर कारवाईचे निर्देश उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यवतमाळ शहरात सुमारे एक हजार २०० तर जिल्हाभरात १६ हजार आॅटोरिक्षा आहेत. या आॅटोरिक्षांना मीटर बंधनकारक आहे. मात्र ते लावले जात नाही. प्रवाशांनाही मीटरनुसार भाडे देणे परवडत नाही. त्यात जवळच्या प्रवाशांना सोय तर दूरच्या प्रवाशांना गैरसोय होते. म्हणून आॅटोला मीटरच लावले जात नाही. हा गंभीर प्रकार निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी आॅटोरिक्षांना मीटर बंधनकारक करण्याचे निर्देश उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. मीटरची ही सक्ती सुरुवातीला यवतमाळ शहरात व नंतर लगेच जिल्हाभरात केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून उपप्रादेशिक परिवहन विभागाने (डेप्युटी आरटीओ) विनामीटर आॅटोरिक्षांवर कारवाईची मोहीम उघडली आहे. आतापर्यंत शंभरावर आॅटोंना चालान केले गेले. अनेक आॅटोरिक्षांना मीटर आहेत. परंतु ते बंद अवस्थेत आहेत. आरटीओची सक्ती पाहता आॅटोरिक्षा चालकांना तीन हजार रुपयांचे मीटर खरेदी करावे लागणार आहे. ही बाब आर्थिक दृष्ट्या परवडणारी नसली तरी आॅटोचालकांनी त्यासाठी पैशाची जुळवाजुळव सुरू केली आहे. मीटर लावल्यानंतर पहिला टप्पा १२ रुपये ५० पैसे तर त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यावर १० रुपये असा दर आकारला जाणार आहे. आॅटोला मीटर लावले तरी त्यासाठी बॅटरी लावावी लागते. अनेकांचे आॅटो घराबाहेर राहत असल्याने ही बॅटरी चोरी जाण्याची भीती असते. दररोज बॅटरी काढून घरात ठेवल्यास मीटरचे सेटिंग बिघडण्याची भीती असते. त्यामुळे मीटर व त्याच्या बॅटरीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरटीओने मोहीम सुरू करताच आॅटोरिक्षा चालकांनी संपूर्ण कागदपत्रे सोबत ठेवणे सुरू केले आहे. मीटरनुसार प्रवास भाडे देणे ग्राहकांना परवडणारे नाही. म्हणूनच आॅटो चालक मीटर लावणे टाळतात. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांनीच सक्ती केल्याने व आरटीओकडून कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने आॅटो चालकांनी नाईलाजाने का होईना मीटर लावण्याची मानसिकता बनविली आहे. मीटरच्या सक्तीवर आॅटोरिक्षा चालकांच्या संघटना मात्र अद्याप मूग गिळून आहेत. यवतमाळ शहरच नव्हे तर वणीपासून उमरखेडपर्यंत सर्वत्र आॅटोरिक्षांना मीटर लावण्याची कारवाई केली जाणार आहे. आॅटोरिक्षा चालकांनी शक्य तेवढ्या लवकर आपल्या वाहनाला मीटर बसवावे, त्यानुसारच प्रवाशांना भाडे आकारावे असे आवाहन करताना येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी देशमुख यांनी नियमाचे पालन न केल्यास आॅटो चालकांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)