शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मेडशीच्या वृध्द शेतक-याने मागीतली इच्छामरणाची परवानगी!

By admin | Updated: November 30, 2014 00:23 IST

शेतकरी म्हणतो, ‘प्रकल्पग्रस्त नव्हे, शासनग्रस्त!’

वाशिम: राज्यावर दुष्काळाची छाया अधीक गडद होत असतानाच, मालेगाव तालुक्यातील एका ७३ वर्षीय वृध्द शेतकर्‍याने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करुन इच्छामरणाची परवानगी मागितल्याने एकच खळबळ उडाली आहे.आपली शेतजमीन शासनाला प्रकल्पासाठी दिल्यापासून आजतागायत न्यायालयाच्या पायरीशिवाय पदरात काहीच पडले नाही, अशी फिर्यादच मेडशीच्या श्रीराम सकरु राठोड यांनी मांडली त्यांच्या निवेदनाच्या माध्यमातून आहे. प्रकल्पासाठी जमीन दिली. त्यामुळे प्रकल्पग्रस्त म्हणून संबोधल्या जाते. प्रत्यक्षात आपण प्रकल्पग्रस्त नसून, शासनग्रस्त आहोत, असे श्रीराम राठोड यांनी म्हटले आहे. राज्यात आजवर अनेकदा सत्तांतर झाले. अनेक लोक मंत्री, मुख्यमंत्री झाले; परंतू प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आजही कायम आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न न्यायोचीत मार्गाने व प्राधान्याने कधीच सोडविल्या गेला नाही. उदरनिर्वाहाचे साधन असलेली शेतजमीन प्रकल्पासाठी दिल्यानंतर, मोबदल्यासाठी न्यायालयाची पायरी चढण्याशिवाय पर्याय नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन देऊन, आपल्या पदरात न्यायालयाच्या पायरीशिवाय मिळते काय, असा उद्विग्न करणारा सवाल श्रीराम राठोड यांनी उपस्थित केला आहे. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली वडिलोपार्जीत जमीन आपण प्रकल्पासाठी दिली. बदल्यात न्यायालयाच्या पायरीशिवाय आपल्याला काहीच मिळाले नाही. आता वृध्दापकाळात न्यायालयाची पायरी चढणे शक्य होत नसल्याने, आपल्याला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी राठोड यांनी वाशिमचे जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांना २६ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे. श्रीराम सकरु राठोड यांच्या निवेदनामुळे प्रकल्पांसाठी जमीन संपादित केल्या गेलेल्या शेतकर्‍यांची व्यथा अधोरेखीत झाली आहे.