शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त रस्ते, धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST

जिल्ह्यात १० जून रोजी सर्वदूर धुवाधार पाऊस कोसळला. यंदाच्या पावसाळ्यातील या पहिल्याच मोठ्या स्वरूपातील पावसामुळे प्रशासकीय यंत्रणेचा मान्सूनपूर्व नियोजनातील ...

जिल्ह्यात १० जून रोजी सर्वदूर धुवाधार पाऊस कोसळला. यंदाच्या पावसाळ्यातील या पहिल्याच मोठ्या स्वरूपातील पावसामुळे प्रशासकीय यंत्रणेचा मान्सूनपूर्व नियोजनातील गाफीलपणा चव्हाट्यावर आला. त्यानंतरही गेल्या ७ दिवसांत अधुनमधून दमदार पावसाची हजेरी सुरूच असून मानोरा शहरातील दिग्रस मार्गावर, येडशी (ता. मंगरूळपीर) फाट्यानजीक, नागठाणा (ता. वाशिम), दापुरी खु. (ता. रिसोड), जवळा (ता. मानोरा) आदी ठिकाणी निर्माणाधिन पुलांची रखडलेली कामे व अस्तित्वात असलेल्या छोट्या स्वरूपातील जमीन समांतर पुलांमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेकडो हेक्टर शेतजमीन अक्षरश: खरडून गेली आहे. यासह अनेक ठिकाणी वाहतूक जागीच ठप्प झाल्याचा प्रकारदेखील घडला.

धोकादायक अवस्थेतील या पुलांप्रमाणेच विविध ठिकाणच्या रस्त्यांचीही प्रचंड दुरवस्था बनली आहे. त्यात प्रामुख्याने रिसोड शहरातील सिव्हिल लाईनकडे जाणारा मुख्य रस्ता, मंगरूळपीर-मानोली, वनोजा-पिंजर, आमगव्हाण-कोंडोली, मोप-बोरखेडी, मानोरा-कारपा यांसह इतरही शेकडो रस्त्यांचा समावेश आहे. तथापि, नदी-नाल्यांवरील धोकादायक पुलांमुळे उद्भवणारी पूरपरिस्थिती व रस्त्यांअभावी दळणवळणाचा जाणवणारा प्रश्न लक्षात घेता, प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी चोख नियोजन करायला हवे होते; मात्र याबाबत उदासीनता बाळगण्यात आल्याने पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात जनजीवन पुरते विस्कळित बनल्याचे दिसून येत आहे.

........................

बाॅक्स :

पूरपरिस्थिती उद्भवल्यास नदीकाठची ६१ गावे होतात बाधित

जिल्ह्यातून पैनगंगा, पूस, कांच, अरुणावती, अडाण, बेंबळा, निर्गुणा, काटेपूर्णा आदी नद्या वाहतात. परिणामी, अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नदीकाठची ६१ गावे बाधित होतात. त्यात गोहोगाव, महागाव, धोडप बु., भापूर, तांदुळवाडी, सरपखेड, मोठेगाव, देगाव, लिंगा कोतवाल, किनखेड, मसलापेन, हिवरापेन, पेडगाव, देऊळगाव बंडा, बेलखेडा, आसेगाव पेन, वरूड तोफा, रिठद, खडकी, बोरखेडी, पाचंबा, गणेशपूर, बाळखेड, वटफळ, पेनबोरी, चिचांबापेन, अडोळी, मांगूळझनक, नेतन्सा, आंचळ, गोवर्धन, जवळा बु., हिवरा बु., कोंडोली, धामणी, कारखेडा, वरोली, मानोरा, रामतीर्थ, मंगरूळपीर, आमगव्हाण, गिरोली, शेमलाई, आंबोडा, लाडेगाव, पिंपळगाव बु., उकर्डा, दिघी, वाकी, वाघोळा, खेर्डा, काजळेश्वर, भाैरद, भिलदुर्ग, वाघी बु., दुबळवेल, वाडी रामराव, पिंपरी बु., मोझरी, धोत्रा, पिंपळखुटा या गावांचा समावेश आहे.

...................

३७ लाखांच्या भरपाईचा प्रस्ताव

मानोरा तालुक्यातील कोंडोली येथून वाहणाऱ्या अरुणावती नदीवर सन २००० मध्ये बांधलेला पूल १० जून रोजी पहिल्याच पावसात वाहून गेला. पुराचे पाणी शेतात शिरून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून ३७ लाखांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.