शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

वसई परिवहनचा अखेर संप मागे, मागण्या मान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 12:16 AM

बुधवारी १५ जानेवारीच्या मकरसंक्रांतीपासून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले होते. या आंदोलनात ७०० च्या वर वाहक आणि चालक सहभागी झाले होते.

- प्रतीक ठाकूरविरार : वसईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून परिवहन कर्मचाऱ्यांचा सुरू घेतलेला संप अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. पालिकेने कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने संप मागे घेत कामगार कामावर परतले आहेत. त्यामुळे शहरातील बससेवा सुरळीत झाली असून प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.बुधवारी १५ जानेवारीच्या मकरसंक्रांतीपासून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले होते. या आंदोलनात ७०० च्या वर वाहक आणि चालक सहभागी झाले होते. महापलिका व कर्मचाºयांमध्ये बोलणी होत असून सुद्धा संपाचा तिढा सुटत नव्हता. श्रमजीवी संघटनेचे नेते व वसईचे माजी आमदार विवेक पंडित यांनी वसईच्या डेपोत आंदोलक कामगारांची भेट घेतली. तसेच त्याच संध्याकाळी महापालिकेच्या अधिका-यांची बैठक झाली. यामध्ये भागीदारी ट्रान्सपोर्टचे मालक मनोहर सकपाळ यांनी सद्यपरिस्थितीत खर्चाचा ताण येतोय, त्यामुळे मी परिवहन सेवा चालवू शकत नाही. त्यामुळे ठेकेदाराने प्रकरणावरून हात वर केल्याने संप सुरूच होता.चौथ्या दिवशी कामगारांनी वसई डेपोत ठिय्या मांडला होता. दरम्यान संध्याकाळी झालेल्या महापालिकेच्या बैठकीत कामगारांच्या चारही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत एकरकमी पगार कर्मचाºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. थकीत भविष्य निर्वाह निधीची रक्कम सहा महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. तसेच सोसायटीची १४ लाखांची रक्कम २८ जानेवारीपर्यंत जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. ज्या कर्मचाºयांचा महागाई भत्ता अदा करण्यात आलेला नसेल त्यांचा भत्ता फेब्रुवारीपर्यंत जमा करण्यात येणार आहे.कामगारांच्या या सर्व मागण्या मान्य झाल्याने चौथ्या दिवशी संध्याकाळी संप मागे घेतला. सर्व मागण्या मान्य झाल्याने कामगार कामावर परतले असून परिवहन सेवा सुरू झाली आहे. दरम्यान, कामावरून परतण्याच्या वेळी हा संप मिटल्याने कामगारांसह प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कर्मचा-यांच्या मागे महापालिका सदैव उभी असून त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.- प्रीतेश पाटील, परिवहन सभापती

टॅग्स :Vasai Virarवसई विरार