शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर जयंतीला सिंधूताई प्रमुख वक्त्या

By admin | Updated: April 13, 2016 01:53 IST

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजिलेल्या सोहळ्यात अनाथांची माय असलेल्या सिंधूताई सपकाळ या प्रमुख वक्त्या असणार आहेत. त्यांचे विचार

जव्हार : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजिलेल्या सोहळ्यात अनाथांची माय असलेल्या सिंधूताई सपकाळ या प्रमुख वक्त्या असणार आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी जव्हार तालुक्यातीलच नव्हे तर पालघर जिल्ह्यातील जनता मोठया संख्येने उपस्थित राहणार आहे. जव्हार, मोखाडा, विक्रमगड सारख्या अतिदुर्गम भागातील जनतेने आज पर्यंत सिंधुताईंचे नाव ऐकले होते, पुस्तके, टी.व्ही.,च्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाबाबत माहिती होती. पण त्यांचे विचार ऐकण्याची संधी गुरुवारी लाभणार आहे.त्यांना ऐकणे ही सुवर्णसंधी असून त्यांचे व्याख्यान प्रेरणादायी असतेच परंतु त्यांचा जीवनातील खडतर प्रवास, त्यांचे अनुभव हे वाचण्यापेक्षा त्यांच्या तोंडून ऐकणे हा एक वेगळाच अनुभव असतो. जव्हार, मोखाडा, विक्रमगड सारख्या भागात अनाथ बालकांचे प्रमाण जरी कमी असले तरी शाळाबाह्य मुले, रोजगारासाठी पालकांचे सतत होणारे स्थलांतर, त्यामुळे होणारी बालकांची परवड ही अनाथ मुलांपेक्षा वेगळी नसते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आई-बाप त्यांना सोडून चार-चार महिने बाहेर असतात. अशा वेळी त्या बालकांना अंगणवाड्या हाच आधार वाटतो. त्यामुळे अशा बालकांसाठी शासनाकडून अथवा स्वयंसेवी संस्थांनी सिंधूताई सारख्या तात्पुरत्या आधार शाळा, निवास व भोजन व्यवस्था केली तर ते सिंधूताईंच्या येण्याचे खऱ्या अर्थाने फलित ठरेल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.या उत्सव समितीचे सभापती नगरसेवक गणेश रजपूत हे असणार आहेत. या दिवशी विविध स्पर्धांचे देखील आयोजन केले आहे. स. १० वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष संदीप वैद्य, सभापती रजपूत, कार्याध्यक्ष राजेंद्र शिरसाठ व उत्सव समिती पुष्पहार अर्पण करेल. स. १०.१५ वा. बुद्धवंदन व सूत्रपठण श्रामनेर जयेश लोखंडे व प्रभाकर बल्लाळ हे करतील. त्या नंतर सिंधूताईंचे व्याख्यान होणार आहे. दु.४ ते रा.१० चित्ररूप भव्य मिरवणूक होणार असल्याची माहिती रजपूत यांनी दिली. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, आ. कृष्णा घोडा, आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष निलेश सांबरे, मा.नगराध्यक्ष दिनेश भट, सामाजिक कार्यकर्ते गोविंद बल्लाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले असल्याचे मुख्यधिकारी व संयोजक वैभव विधाते यांनी सांगितले.