शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

Maharashtra Election 2019: वसईत कोण घेणार आघाडी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 12:47 AM

Maharashtra Election 2019: पालघर लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्यावर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवण्याच्या दृष्टीनेच शिवसेना आणि मित्र पक्ष वसईत उतरलेले दिसतात.

- आशिष राणेवसई : पालघर लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्यावर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवण्याच्या दृष्टीनेच शिवसेना आणि मित्र पक्ष वसईत उतरलेले दिसतात. मात्र, मुळातच विरोधकांकडे कधीही सत्ता नव्हती. त्यामुळे विरोधक विकासाच्या मुद्यावर काही बोलू शकत नाहीत, असे मानणारा एक वर्ग येथे दिसून येतो.

महायुतीचे उमेदवार विजय पाटील यांनी जरी प्रचारासाठी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीवर कितीही आरोप केले तरी विजय पाटील यांनी आपल्या प्रचारात आजवर केलेली विकासकामे मांडण्यावर भर दिला. वसई मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी मिळविण्यासाठी बविआ व महायुती या दोघांचेही जोरदार प्रयत्न दिसले. मनसेसह अन्य तीन उमेदवार रिंगणात आहेत. तरी येथे मुख्य लढत बविआ विरूद्ध शिवसेना अशीच दिसणार आहे.

वसईत पराभव झाल्यानंतर बविआने वसई मतदारसंघावर साडेचार वर्षे संपूर्ण लक्ष केंद्रित केले. जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रि य करणे, जनसंपर्क कार्यालये सुरू करणे यासह ग्रामीण भागात घटलेला जनाधार वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. याचबरोबर गावोगावी संपर्क ठेवत नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर दिल्याचे दिसते.

दुसरीकडे वसई आणि नालासोपारा या दोन्ही जागा भाजपला हव्या होत्या. मात्र या दोन्ही जागा सेनेच्या वाट्याला आल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यातच येथील भाजपचा मुख्य गटाने शिवसेनेचा प्रचार करणार नाही, असा पवित्राही घेतला आहे. त्यामुळे दोघांचे भांडण बविआचा फायदा होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. याशिवाय येथील ख्रिस्ती मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकतो, हेही महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Hitendra Thakurहितेंद्र ठाकूरPradeep Sharmaप्रदीप शर्माShiv Senaशिवसेनाvasai-acवसई