शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: वसईत कोण घेणार आघाडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 00:47 IST

Maharashtra Election 2019: पालघर लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्यावर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवण्याच्या दृष्टीनेच शिवसेना आणि मित्र पक्ष वसईत उतरलेले दिसतात.

- आशिष राणेवसई : पालघर लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्यावर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवण्याच्या दृष्टीनेच शिवसेना आणि मित्र पक्ष वसईत उतरलेले दिसतात. मात्र, मुळातच विरोधकांकडे कधीही सत्ता नव्हती. त्यामुळे विरोधक विकासाच्या मुद्यावर काही बोलू शकत नाहीत, असे मानणारा एक वर्ग येथे दिसून येतो.

महायुतीचे उमेदवार विजय पाटील यांनी जरी प्रचारासाठी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीवर कितीही आरोप केले तरी विजय पाटील यांनी आपल्या प्रचारात आजवर केलेली विकासकामे मांडण्यावर भर दिला. वसई मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी मिळविण्यासाठी बविआ व महायुती या दोघांचेही जोरदार प्रयत्न दिसले. मनसेसह अन्य तीन उमेदवार रिंगणात आहेत. तरी येथे मुख्य लढत बविआ विरूद्ध शिवसेना अशीच दिसणार आहे.

वसईत पराभव झाल्यानंतर बविआने वसई मतदारसंघावर साडेचार वर्षे संपूर्ण लक्ष केंद्रित केले. जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रि य करणे, जनसंपर्क कार्यालये सुरू करणे यासह ग्रामीण भागात घटलेला जनाधार वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. याचबरोबर गावोगावी संपर्क ठेवत नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर दिल्याचे दिसते.

दुसरीकडे वसई आणि नालासोपारा या दोन्ही जागा भाजपला हव्या होत्या. मात्र या दोन्ही जागा सेनेच्या वाट्याला आल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यातच येथील भाजपचा मुख्य गटाने शिवसेनेचा प्रचार करणार नाही, असा पवित्राही घेतला आहे. त्यामुळे दोघांचे भांडण बविआचा फायदा होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. याशिवाय येथील ख्रिस्ती मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकतो, हेही महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Hitendra Thakurहितेंद्र ठाकूरPradeep Sharmaप्रदीप शर्माShiv Senaशिवसेनाvasai-acवसई