शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

जंगल सफारी, वर्षा सहलींच्या आनंदावर विरजण; यंदा पावसाळी पर्यटनावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 2:55 AM

नियमांचे उल्लंघन झाल्यास होणार कडक कारवाई

पारोळ : वसईतील निसर्गरम्य परिसर आणि पावसाळा म्हटला की, पर्यटकांना वन-डे पिकनिकसाठी चांगली मेजवानीच असते. दरवर्षी जंगल सफारी आणि वर्षा सहलीचा आनंद लुटत वसईतील सागरी किनारे तसेच तुंगारेश्वर अभयारण्यातील पावसाळा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आसुसलेले असतात. यंदा मात्र पर्यटकांच्या या उत्साहावर कोरोनाचे सावट असल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

पावसाळी पर्यटनावर जिल्हा प्रशासन आणि वन विभागाने निर्बंध लादत २७ आॅगस्टपर्यंत वसईत पर्यटकांना पावसाळी पर्यटनासाठी येता येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. आदेशाची पायमल्ली करून पर्यटनासाठी पर्यटक दाखल झाल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.ऐतिहासिक वसईला निसर्ग, सागरी, विविध लोकजीवन आणि इतिहासाचा समृद्ध वारसा लाभला आहे. पावसाळ्यात येथील निसर्गाने अंगावर ओढलेला हिरवागार शालू मन वेधून घेतो. मन प्रसन्न व आल्हाददायक करणारे वातावरण पावसाळ्यात चोहोबाजूने पाहावयास मिळत असल्याने ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या ठिकाणाहून पर्यटक मोठ्या संख्येने वसईत दाखल होतात. पावसाळ्यात पाऊस आणि सोबत मित्र कंपनी असली की, पाण्यात डुबक्या मारायला, बागडायला मज्जाच मज्जा येत असल्याने वसईतील पावसाळी पर्यटन स्थळे पर्यटकांच्या पसंतीची पहिली केंद्रे ठरली आहेत.

तुंगारेश्वर अभयारण्यातील जंगल सफारी तसेच येथील धबधबा आणि चिंचोटी परिसरातील मोठा धबधबा या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. स्थानिकांनादेखील या पर्यटनामुळे चांगला रोजगार मिळतो. वसईतील सागरी किनारेदेखील पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांना वेधून घेत असल्याने विकेण्डला पर्यटकांची या ठिकाणी तोबा गर्दी पाहायला मिळते. मनाला विसावा देणारी ही पर्यटन स्थळे यंदा कोरोना महामारीमुळे ओस पडली आहेत. सध्या शासनाने टाळेबंदीचे नियम शिथिल केले असले तरी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना २७ आॅगस्टपर्यंत बंदी असणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे आणि वन विभागाने दिले आहेत. वसईतील पावसाळी पर्यटन दरवर्षी धोकादायक ठरू लागले आहे. त्यामुळे यंदा कोरोनाचा धोका आणि पर्यटन स्थळाभोवती असलेला धोका पाहता ही पर्यटन स्थळेच पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी जिल्हा व वन विभागाने ही खबरदारी घेतली आहे. तुंगारेश्वर अभयारण्याच्या हद्दीत पावसाळी पर्यटनावर वन विभागाचे बारीक लक्ष असणार आहे. नियम डावलून कोणी त्या ठिकाणी गेल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.पावसाळी पर्यटनामुळे स्थानिकांना चांगला रोजगार मिळतो. यंदा ही पर्यटनस्थळेच बंद करण्यात आल्याने स्थानिकांचा रोजगार बुडणार आहे. आधीच रानातील रानमेवा, रानभाज्या कोरोनामुळे विकल्या जात नसल्याने स्थानिक गोरगरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यात पावसाळी पर्यटन बंद राहिल्याने स्थानिकांचे प्रचंड हाल होणार आहेत. यंदा पावसाळी पर्यटनावर कोरोनाचे संकट असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

टॅग्स :tourismपर्यटन