शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

धक्कादायक! पंपावर पेट्रोलऐवजी चक्क पाणी, ग्राहकांची होतेय फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 11:56 PM

इंधन भरल्यानंतर वाहने बंद : चालकांत संताप

पारोळ : मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील सकवार येथील इंडियन आॅईलच्या श्रीजी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांमध्ये पेट्रोलऐवजी चक्क पाणी भरले गेले. येथून इंधन म्हणून पेट्रोल भरून पुढे गेलेली वाहने प्रवासातच अर्ध्या रस्त्यात बंद पडली. चालकाने मेकॅनिकला बोलावले असता, इंधनात पाणी गेल्याने गाडी बंद पडल्याचे समजले. याबाबत आपली बाजू मांडताना पंप चालकाने झाल्या प्रकारासाठी शासनाला जबाबदार धरले आहे. शासनामार्फत जे १० टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यात येते त्यामुळे पाणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर पंपावर पेट्रोल भरून एक चालक गुजरात दिशेकडे निघाला. मात्र, तीन साडेतीन किमी. पुढे गेला असताना त्याची कार भरपावसात रस्त्यातच बंद पडली. चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून मेकॅनिक बोलावला असता इंधनात पाणी असल्याने बिघाड झाल्याचे समजले. यामुळे वाहनचालकाने खानिवड्यातील नातेवाईक हरिश्चंद्र पाटील आणि भामटपाडा येथील अजित किणी याच्याबरोबर श्रीजी पंपावर धाव घेतली. याचवेळी येथे एका दुचाकीत पेट्रोल भरणे सुरू होते. ते चेक केले असता पेट्रोलऐवजी चक्क पाणी पंप होताना दिसले. हा प्रकार उघडकीस आल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. याबाबत स्पष्टीकरण देताना पंप चालक केयूर पारीख याने याचे खापर शासनावर फोडले. शासन मिसळत असलेले इथेनॉल हे हायड्रोस्कोपिक असल्याने पाणी खेचते. तसेच स्टोक टँक बसवणे हे कंपनीचे काम असून आम्ही फक्त खरेदी करून विक्री करतो, असे सांगितले. शासनाने पावसाळ्याचे चार महिने इथेनॉल मिसळणे बंद करावे, अशी मागणी पेट्रोल असोसिएशनचा सेक्रेटरी म्हणून आपण करत असल्याचेही ते म्हणाले. मात्र, असे जर असेल तर हा प्रकार इतर पंपांवरही व्हायला हवा होता, असे त्यांना विचारले असता, ते काहीही बोलू शकले नाहीत. दरम्यान, पीडित चालकांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. खूप मोठ्या प्रमाणावर कोसळणाºया पावसामुळे कुठूनतरी पाणी आत घुसले असावे. स्टोक टँक आणि पंपिंगच्यामध्ये असणारे गॅस्केट लीक असावे, असे ते म्हणाले.

टॅग्स :WaterपाणीPetrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंप