शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

जागोजागी पेटवल्या जात आहेत शेकोट्या; थंडीचा कडाका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 11:52 PM

चार - पाच दिवसांपासून वाढला गारवा

विक्रमगड : तालुक्यातील बहुतेक ठिकणची भात कापणीची कामे संपली असून भातामुळे वातावरणात उष्णतेचे प्रमाण निर्माण होत असते. परंतु आता थंडीचे दिवस आले असल्याने विक्रमगड तालुक्यात बोचऱ्या थंडीने शिरगाव केला आहे. तसेच दिवस लहान असल्याने रात्र लवकर होते आणि सकाळही लवकर होते. त्यामुळे तालुक्यातील घरांच्या खिडक्या व दरवाजे सकाळी उशिरापर्यंत तर संध्याकाळी लवकरच बंद होत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून विक्रमगड परिसरात थंडीचे प्रमाण वाढले आहे. दिवसभर देखील हवेत अंगावर रोमांच आणणारा गारवा जाणवतो आहे. तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून थंडीची सरासरी वाढल्याने तापमानात घट झाली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. थंडीमुळे तालुक्यातील दैनंदिन व्यवहार सकाळी उशिराने सुरू होऊन सायंकाळी लवकर बंद केले जात आहेत. रात्री ८ वाजल्यानंतर तालुक्यातील रस्ते सुनसान होत आहेत. तर जंगलपट्टी भागात तर सायंकाळी ६ वाजताच घराची दारे खिडक्या बंद केली जात आहेत.

थंडीपासून बचाव करण्यासाठी लहान मुले, स्त्रिया, पुरुष तसेच वृद्ध असे सारेच दिवसादेखील गरम कपडे परिधान करीत आहेत. थंडीमुळे पाण्याचा तापमानात मोठी घट झाली असल्याने सकाळी उठल्यावर तोंड धुण्यासाठी अथवा सायंकाळीही पाणी गरम करून घ्यावे लागते. तालुक्यातील ग्रामीण भागात सायंकाळी मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटवलेल्या दिसतात. त्यामुळे थंडीची तीव्रता अजूनही किती वाढणार आहे, याचा अंदाज बांधता येत नाही. कारण आताच तर थंडीला सुरु वात झाली आहे. बरीचशी मंडळी निसर्गातील वातावरणाचा आनंद लुटताना दिसतात. तर काहीजण सध्याच्या वातावरणाशी जुळवून घेत आहेत.