शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : अखेर वसईचा किल्ला हितेंद्र ठाकुरांनी जिंकलाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 06:07 IST

सहा उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत बविआ आणि शिवसेनेतच

- आशिष राणे

वसई : वसई विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांनी सुरु वातीपासूनच मतांची आघाडी घेत ६ व्या फेरी नंतर आपल्या ऐतिहासिक वसईच्या विजयाची पताका रोवली. २५ हजार मतांचा विक्र मी टप्पा पार करीत त्यांनी आपला विजय नोंदवला. वसईत ६ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत हितेंद्र ठाकूर आणि शिवसेना उमेदवार विजय पाटील यांच्यात होती.

वसई निवडणुकीच्या मतमोजणीत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा उमेदवार हितेंद्र ठाकूर यांना २५ हजार ८३६ मतांनी विक्र मी आघाडी घेत ते विजयी झाले. या ऐतिहासिक लढतीत ठाकूर यांना एकूण १ लाख २ हजार ४६८ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार विजय पाटील यांना एकूण ७६ हजार ६३२ मतांवर समाधान मानावे लागले.

सुरुवातीस युती होईल की नाही अशी अटकळ होती. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घटक पक्षांना घेऊन महाआघाडी तयार केली. खरे तर एका बाजूला आगरी, कुणबी, आणि आदिवासी समाज तर दुसरीकडे पश्चिम पट्ट्यातील ख्रिस्ती मतांचे मोठे विभाजन होणार अशी अटकळ होती. मात्र ठाकुरांना या तीनही समाजबांधवाकडून तसेच वसईच्या पूर्व - पश्चिम भागातून बऱ्यापैकी मते मिळाल्याने विरोधाचा प्रचार करूनही ठाकुरांचे मताधिक्य वाढले व ठाकूर पुन्हा निवडून आले.

आजवरच्या विकास कामांना जनतेसमोर ठेवून यापुढेही आपण एमएमआरडीए, सॅटेलाईट सिटी, आणि वसई - विरार महापालिकेच्या माध्यमातून केवळ विकास हेच उद्दिष्ट समोर ठेवून आपण विकासाला प्रध्याना देत आहोत, हा प्रचाराचा एकमेव आणि प्रमुख मुलभूत गरजांचा खरा मुद्दा वसईकरांसमोर मांडल्यानेच हितेंद्र ठाकूर यांना वसईचा गड पुन्हा काबीज करता आला.

त्यातच विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर न बोलता केवळ ठाकुरांची दहशत आणि त्यांच्या गुंडागर्दीवर बोलून अखेरच्या दिवसापर्यंत हा गुंडिगरीचा चुकीचा अपप्रचार सुरू ठेवला. हा मुद्दा विरोधकांना भोवला. त्यामुळे ही निवडणूक तशी एकतर्फीच झाली, असे म्हणावे लागेल. मात्र बविआ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आणि स्वत: हितेंद्र ठाकूर यांनी प्रचाराचा झंझावात वसई भर करून वसईत केवळ पिवळे वादळ निर्माण करीत वसईतील विकासाचाच मुद्दा पुढे नेला आणि विरोधकांची पुरती हवाच काढून टाकली. येथे काहीही दहशत किंवा गुंडगिरी नाही हेच या दणदणीत विजयाने पुन्हा दुसऱ्यांदा दाखवून दिले.

वसई गावातील सेंट गोंसालो गारिसया महाविद्यालय व त्याच्या प्रांगणात गुरुवारी रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरु वात झाली. त्यात पहिल्या आणि नंतरच्या ६ व्या फेरीपासूनच बविआचे हितेंद्र ठाकूर यांनी मताधिक्याची घोडदौड कायम राखली होती. दुसºया फेरीपर्यंत ठाकूर यांनी दीड हजार मतांची आघाडी घेतलेली होती.

अगदी ११ व्या फेरीपर्यंत ही आघाडी कमी अधिक फरकाने कायम ठेवण्यात ठाकुरांना यश आले. ज्या ठिकाणी मागील वेळी गावांचा मोठा विरोध राहिला त्याच ग्रामीण पट्यातून ठाकूर यांनी आपली मतांची आघाडी कायम राखीत अखेर शहराकडील मतपेट्याच्या आकडेवारी आल्या तेव्हा अवघ्या काही तासातच ठाकूर यांनी घवघवीत विजय संपादन केला. बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या विजयाचे सारे श्रेय केवळ वसईकरांना दिले आहे.

आपली राजकीय पोळी भाजण्यात अयशस्वी ठरलेले शिवसेनेचे उमेदवार विजय पाटील यांना या पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. तसेच ग्रामीण भागातून ठाकूर यांच्या पारड्यात टाकलेली निर्णायक मते पाहिल्यास ग्रामीण आणि शहरी जनतेनेही विजय पाटील यांना नाकारले आहे. अगदी शांततेत ही निवडणूक प्रक्रि या वसईचे निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील तांगडे व सहा. निवडणूक अधिकारी किरण सुरवसे व अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019vasai-acवसई