शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

कोरोनाच्या महामारीमुळे कुंभार समाज सापडला आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 11:30 PM

शहापूर तालुक्यातील चित्र : हजारो माठ विक्रीअभावी घरातच पडून; कारागीर, व्यावसायिकांपुढे कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न

रवींद्र सोनावळे

शेणवा : कोरोनामुळे ग्रामीण भागातील अनेक व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या व्यवसायावर अवलंबून असणारे कारागीर आणि कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पारंपरिक व्यवसाय म्हणून तयार केलेले मातीचे माठ विक्रीअभावी घरातच पडून राहिल्याने या कुंभार समाजावर आर्थिक संकट ओढवले आहे.

शहापूर तालुक्यातील अस्नोली, अल्यानी, चेरवली, बोंद्रेपाडा, सावरपाडा, बिरवाडी, लाहे, शेई येथील कुंभार समाज गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणारा मातीचे माठ तयार करतात. यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मातीचा माठ तयार करण्यासाठी माती, जळाऊ लाकडे, शेण, लीद, आदी सामग्री लागते. त्यासाठी खर्चही आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे असे वर्षभरातील चारच महिने चालणारा हा व्यवसाय असून, एक कारागीर रोज दहा ते पंधरा माठ तयार करतो व लहानमोठ्या आकारानुसार दर ठरवून माठांची विक्री दारात येणाऱ्या स्थानिक किरकोळ ग्राहक किंवा घाऊक व्यापाऱ्यांद्वारे करतात. उन्हाळ्यात माठाला कल्याण, ठाणे, डोंबिवली व इतर शहरांतून मागणी असते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे किरकोळ ग्राहक किंवा घाऊक व्यापारी फिरकत नसल्याने माठ विक्रीअभावी दारातच पडून आहे. पावसाळ्यात हे माठ ठेवायचे कुठे या समस्येने व्यावसायिक ग्रासले आहेत. माठांच्या विक्रीअभावी आर्थिक समस्या भेडसावणाऱ्या कुंभार समाजासमोर व्यापाऱ्यांकडून आगाऊ घेतलेली रक्कम फेडायची कशी, पावसाळ्यात खाणार काय, कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार कसा, असे प्रश्न उभे ठाकले आहेत.

माठांची विक्री झाली नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कुंभार बांधवांना आर्थिक मदत म्हणून अनुदान मिळावे अशी सरकारकडे मागणी केली आहे.    - संदीप पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवा     कार्याध्यक्ष, कुंभार समाज

कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या समाज बांधवांना अनुदान मिळावे यासाठी सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी करणार आहे.    - कृष्णा सोनावळे, माजी     जिल्हाध्यक्ष, कुंभार समाजविक्रीअभावी तयार माठ दारातच पडून असल्याने आर्थिक समस्येने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाची गंभीर समस्या उद्भवली आहे.    - बबन सोमवते,    कारागीर, सावरपाडा

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार