शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

हळद सुकण्यापूर्वी युवकाचा मृत्यू

By admin | Updated: May 3, 2015 01:48 IST

युवकाने २४ एप्रिल रोजी विवाह उरकून पत्नीला घरी आणले़ संसाराची स्वप्ने रंगवीत असताना ..

समुद्रपूर : युवकाने २४ एप्रिल रोजी विवाह उरकून पत्नीला घरी आणले़ संसाराची स्वप्ने रंगवीत असताना अंगाची हळद सुकण्यापूर्वीच त्याला मृत्यूने कवटाळले़ ही घटना किन्हाळा येथे शनिवारी सकाळी उघड झाली़ राहूल भास्कर गलांडे (२४) याचा शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नरेंद्र मोहरे यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळला़राहूलच्या वडिलाचा आधीच मृत्यू झाला़ तेव्हा त्याची आई इंदूबाई भावाच्या छत्रछायेत किन्हाळा येथे राहू लागली. मामा वसंत बैलमारे यांच्या संस्कारात राहूल वाढला व जबाबदारी म्हणून पी.व्ही. टेक्सटाईल येथे काम करीत होता़ किन्हाळा येथेच लहान घर बांधून तो आई इंदूबाईसह राहत होता़ सर्व व्यवस्थित झाल्याने विवाहाचा विचार करीत पी.व्ही. टेक्सटाईल जाम येथेच कार्यरत विठ्ठल गायधने यांच्या मुलीशी लग्न ठरविले़ २४ एप्रिलला हळदगाव येथे प्रियंकाशी विवाह व २५ रोजी गावात स्वागत समारोहही झाला. आईच्या एकमेव मुलाचे लग्न व घरी नववधू आल्याने आनंदाचे वातावरण होते; पण यास काळाने घात केला़ लग्न होताच दोन वर्षांत पती गेला; पण मुलाकरिता ती सावरली होती़ अशातच ३० एप्रिल रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास राहुल घरून निघून गेला. सर्वत्र तपास केला; पण पत्ता लागला नाही. शनिवारी नरेंद्र मोहरे शेतात गेले असता विहिरीत राहूलचा मृतदेह आढळला़ पोलिसांनी पंचनामा केला़ हळद सुकण्यापूर्वीच राहूलच्या मृत्यूने नववधूवर आघात झाला तर आई नि:शब्द झाली़ या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे़(तालुका प्रतिनिधी)