शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

रोहिणी नक्षत्रात कापूस लागवडीचे संकेत

By admin | Updated: May 24, 2015 02:29 IST

जिल्ह्यात कडकडीत ऊन्ह तापत आहे. अशात पावसाने अधूनमधून पावसाची हजेरी लावली.

विजय माहुरे सेलूजिल्ह्यात कडकडीत ऊन्ह तापत आहे. अशात पावसाने अधूनमधून पावसाची हजेरी लावली. यामुळे पाहता ओलिताची सोय असलेले शेतकरी रोहिणी नक्षत्रात कपाशीची पेरणी करण्याच्या तयारीला लागले आहेत. गत तीन वर्षांपासून जिल्हातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करीत आहे. यातून सावरून शेतकरी पुन्हा एकदा आशेचा किरण घेऊन कपाशी लागवडीला सामोरा जात आहे. उन्हाळवाहीची कामे सुरू असताना एप्रिल व मे महिन्यात पावसाने हजेरी लावली. आलेल्या पावसामुळे नांगरणी केलेल्या शेतात पुन्हा तण उगवायला सुरुवात झाली. परिणामी शेतकऱ्यांना दुबार नागरणीच्या खर्चाला सामोरे जावे लागले.बहुतांश शेतकरी कपाशी लागवड व सोयाबीनची पेरणी मृग नक्षत्रात दमदार पावसानंतरच करतात. पण ओलिताची सोय असलेले शेतकरी हवामानाचा अंदाज घेत अवघ्या काही दिवसांनी सुरू होणाऱ्या रोहिणी नक्षत्रातच ठिबक व तुषार सिंचनावर कपाशी लागवडीची तयारी करीत आहे. रोहिणी नक्षत्रात कपाशीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना रोपटे जगविण्यासाठी त्रास घ्यावा लागत असला तरी अधिक उत्पन्न येण्याचे शेतकरी सांगत आहे. ७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होणार आहे. या नक्षत्रात पाऊत येतोच, असा अंदाज शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे सेलू परिसरात अवघ्या काही दिवसांतच कपाशीच्या लागवडीला सुरुवात होणार असल्याचे चित्र आहे.काही वर्षांपूर्वी पीक पेरणीपूर्वी धूळ पेरणी केली जात होती. पाऊस आला की पेरलेल्या बिजांना अंकूर फुटायचे. गत काही वर्षांपूर्वी ओलिताचे नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत ठिबक व तुषार सिंचनाच्या सहाय्याने पीक घेतल्या जात आहे. या काही वर्षात धूळपेरणी हा प्रकार खूपच कमी झाला असून काहीच ठिकाणी धूळपेरणी केली जात आहे. वाढीव दरामुळे तुरीचा पेरातुरीला या वर्षी मिळालेला भाव पाहता तुुरीचा पेरा वाढणार असा अंदाजही शेतकरी व्यक्त करीत आहेत. यंदा सोयाबीनचा पेरा वाढणारअधिक उत्पन्न मिळावे म्हणून कॅश क्रॉप असलेल्या ऊस लागवडीकडे कल वाढत आहे. ऊस लागवड करावयाची असल्यास आधी सोयाबीनची पेरणी करणे गरजेचे असते. त्यामुळे सोयाबीनचा पेरा जिल्ह्यात वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीनची मळणी होताच ऊस लागवड केली जाते. कृषी विभाग व शेतकऱ्यांत नियोजनाची तफावतकृषी विभागाने केलेल्या खरीपाच्या नियोजनात कपाशीचे लागवड क्षेत्रात वाढणार असे दर्शविले आहे, परंतु सतत तीन ते चार वर्षांपासून कापसामुळे शेतकरी आर्थिक गार्तेत सापडला आहे. यामुळे कापूस का लावावा असे मत जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. सोयाबीन पेरल्यास रब्बी हंगामात गहू, चणा, भूईमूंग व ऊस आदी पिके घेतली जातात. यामुळे कृषी विभागाच्यावतीने केलेल्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.