शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीला कुलूप

By admin | Updated: September 11, 2014 23:44 IST

शहरालगत असलेल्या सिंदी (मेघे) परिसरात विविध समस्यांचा अंबार लागला असून ग्रामपंचायतीच्यावतीने त्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या येथील नागरिकांनी गुरुवारी

वर्धा : शहरालगत असलेल्या सिंदी (मेघे) परिसरात विविध समस्यांचा अंबार लागला असून ग्रामपंचायतीच्यावतीने त्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या येथील नागरिकांनी गुरुवारी ग्रामपंचयातीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. शिवाय विविध मागण्यांचे निवदेन निवासी जिल्हाधिकारी सुनील गाढे यांना दिले. त्यांनी निवेदनकर्त्यांचे म्हणणे ऐकूण त्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले. सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीत अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. यात ग्रामपंचायतीला कायमस्वरुपी ग्रामसेवक नसल्याने नागरिकांच्या समस्या सोडविणे कठीण जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या ग्रामपंचायतीचा प्रभार असलेला ग्रामसेवक नागरिकांनी काही विचारणा केली असता योग्य उत्तर देत नसल्याचा आरोप आहे. शिवाय सरपंच व उपसरपंच गावातील समस्यांबाबत अनभिज्ञ असून त्या सोडविण्याकरिता त्यांच्याकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.गावातील लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावात ठिकठिकाणी कचारा साचला आहे. नाल्या तुंबल्या आहेत. यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. डासांमुळे या भागातल नागरिकांना अनेक समस्या होत आहेत. यामुळे आजार पसरत आहे. याकडे लक्ष देण्याकडे कोणीच तयार नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. तसेच मागण्या सोडविण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय गाठत निवासी जिल्हाधिकारी यांना निवदेन सादर केले. गाढे यांनी गावकऱ्यांचे म्हणणे ऐकत त्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यापालन अधिकाऱ्यांकडे पाठविले. यावेळी सुधीर आगलावे, उषा बसवंत, विमल काळे, सुषमा भेदरकर, मंगला भरणे, कविता बसवंत, नलिनी निशाने, सुमन सोनटक्के यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)