शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

भदाडी नदीपात्रात वाळू चोरांनी पाडले भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

या नदीपात्राला वाळूचोरांनी लक्ष्य केले आहे. रात्री-अपरात्री चोरट्यांकडून वाळूचा वारेमाप उपसा केला जात आहे, विशेष म्हणजे, वाळूचोरांनीच वाळूच्या वाहतुकीकरिता छुपे रस्तेदेखील तयार केले आहेत. वायगाव ते शिरसगाव (धनाढ्य) या मार्गादरम्यान गवळीबाबा मंदिराजवळ असलेल्या नदीपात्रातून सालोड येथील वाळूचोरांनी हैदोस घातला आहे.

ठळक मुद्देप्रशासनापुढे आव्हान : नदीपात्रात शिल्लक केवळ माती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील विविध वाळूघाटांत मागील काही महिन्यांपासून वाळूतस्करांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे. या चोरांच्या मुसक्या आवळण्यात महसूल विभागाला अपयश येत असल्याने लाखोंच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. वायगाव (नि.) नजीकच्या भदाडी नदीपात्रातून वाळूचोरांनी वाळूचा अवैधरीत्या वारेमाप उपसा चालविला आहे. परिणामी पात्रात केवळ मातीच शिल्लक राहिली आहे. वाळूवाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांचीही वाट लागत असून वाहनांच्या आवाजाने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वाळूचोरांवर कारवाई महसूल पोलीस प्रशासनापुढे आव्हान ठरली आहे.वायगाव (नि.) जवळून भदाडी नदी वाहते. या नदीचा पुढे यशोदा नदीपात्राशी संगम झालेला आहे. भदाडी नदीचे नुकतेच खोलीकरण करण्यात आले. कोटींची गौण खनिज संपदा या नदीपात्रात आहे. या नदीपात्राला वाळूचोरांनी लक्ष्य केले आहे. रात्री-अपरात्री चोरट्यांकडून वाळूचा वारेमाप उपसा केला जात आहे, विशेष म्हणजे, वाळूचोरांनीच वाळूच्या वाहतुकीकरिता छुपे रस्तेदेखील तयार केले आहेत. वायगाव ते शिरसगाव (धनाढ्य) या मार्गादरम्यान गवळीबाबा मंदिराजवळ असलेल्या नदीपात्रातून सालोड येथील वाळूचोरांनी हैदोस घातला आहे. रात्रीतून नदीपात्रातून वाळूचा उपसा केला जात असून तयार केलेल्या वाटेवरून त्याची वाहतूकदेखील केली जात आहे. वाळू भरलेल्या वाहनांमुळे या परिसरातील रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे. येथून शेतकरी-शेतमजुरांना आवागमन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दुर्दशेस कारणीभूत वाळूचोरांकडून शासकीय मालमत्तेच्या नुकसानापोटी विशषे दंड आकारणी करावी, अशीही मागणी होत आहे.वाळूवाहतुकीकरिता तयार केल्या वाटानदीपात्रातून रात्रीच्या चंदेरी प्रकाशात चोरट्यांकडून वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जातो. उपसा केलेली वाळूची वाहतूक करीत शिरसगाव (ध) कडे जाणाऱ्या मार्गावरील दुसऱ्या कालव्याजवळ टाकली जाते. हीच वाळू अवजड वाहनांमध्ये भरून आजगावमार्गे पालोती-वर्धा अशी सालोड (हिरापूर) येथे विल्हेवाट लावली जाते. यामुळे आजगाव मार्गाची चाळण झाली आहे. शेतकऱ्यांना त्रास होत आहे.कालव्याची भिंत धोकादायक वळणावरवाळू भरलेल्या जड वाहनांची शिरसगाव (ध.) मार्गावरील दुसºया कालव्याजवळून सातत्याने वाहतूक केली जात असल्याने कालव्याची भिंत खचण्याच्या स्थितीत असून यामुळे शेतकरी, शेतमजुरांना धोका होऊ शकतो. याकडे संबंधित विभागाची डोळेझाक आहे. वाळूचोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :sandवाळूriverनदी