शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

तहसीलदारांना दिले कपाशीचे झाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 6:00 AM

यंदाच्या खरीप हंगामातील जून महिन्यात सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाला. त्यामुळे पेरणीस उशीर झाली. प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या व दुसºया आठवड्यात पेरणीस सुरुवात झाली. तालुक्यात जुलै ते आक्टोबरमध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यावर्षी पावसाला उशीरा सुरुवात झाली तसेच पीक वाढीच्या कालावधीत सतत पाऊस व ढगाळ वातावरण राहिल्याने किड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आंदोलन : ओला दुष्काळ जाहीर करा

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : कारंजा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी तहसीलदारांना घेराव घालण्यात आला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन व कपाशीचे झाड तहसीलदार सचिन कुमावत यांना दिले.यंदाच्या खरीप हंगामातील जून महिन्यात सरासरीच्या ४० टक्के पाऊस झाला. त्यामुळे पेरणीस उशीर झाली. प्रत्यक्षात जुलैच्या पहिल्या व दुसºया आठवड्यात पेरणीस सुरुवात झाली. तालुक्यात जुलै ते आक्टोबरमध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यावर्षी पावसाला उशीरा सुरुवात झाली तसेच पीक वाढीच्या कालावधीत सतत पाऊस व ढगाळ वातावरण राहिल्याने किड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच जमिनीची योग्य मशागत न झाल्याने पिकांचीही वाढ खुंटत फुल व फळधारणा कमी झाली आहे. अशातच परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, अद्यापही शासनाकडून भरीव शासकीय मदत जाहीर झालेली नाही. ढगाळी वातावरण व पाऊस यामुळे सोयाबीन उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर फळ शेती करणाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. सध्या कपाशीचे बोंड सडत असून उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता सर्व शेतकºयांना प्रति हेक्टर सरसकट २५ हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना आ. दादाराव केचे, मंगेश खवशी, उपसभापती रंजना टिपले, जि. पं. सदस्य श्वेता धोटे, सरीता गाखरे, सुरेश खवशी, सभापती निता गजाम यांच्यासह शेतकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कपाशीवर लाल्या अन् बोंडअळीचाही प्रादुर्भावपरतीच्या पावसामुळे कपाशी पिकाचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात अखेरीस झालेल्या परतीच्या पावसानंतरही जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम राहिल्याने सध्या गुलाबी बोंडअळी तसेच लाल्याचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर दिसून येत असल्याचेही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :TahasildarतहसीलदारFarmerशेतकरी