शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

५४७ शेतकरी घेतात भाजीपाल्याचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

सदर बंदीच्या काळात याच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा हा नाशवंत शेतमाल (भाजीपाला) कुठलीही अडचण न येता नियमित बाजारपेठत पोहोचल्यास वर्धा जिल्ह्यात भाजीकोंडी होणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी कृषी विभागाकडून योग्य नियोजन करून त्यावर प्रभावी कार्यवाही होणेही गरजेचे आहे.

ठळक मुद्देहिंगणघाट ठरतेय हब : प्रभावी नियोजन झाल्यास सुटणार भाजीकोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात येणाऱ्या भाजीपाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हाधिकाºयांचा हा निर्णय थोडा कठोर मात्र महत्त्वपूर्ण असून जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत भाजीकोंडी होऊ नये यासाठी बुधवारी पार पडलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना योग्य नियोजनासह प्रभावी कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर कृषी विभागाने जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची गाव निहाय माहिती गोळा केली. जिल्ह्यातील ५११ गावांमधील ५४७ शेतकरी विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत असल्याचे यातून पुढे आले आहे.वर्धा तालुक्यातील १२ गावांमधील ४५ शेतकरी विविध प्रकारचा १६२.२० क्विंटल, कारंजा तालुक्यातील २६ गावांमधील ५५ शेतकरी ३९२.४० क्विंटल, देवळी तालुक्यातील १४ गावांमधील ४१ शेतकरी ३५४.५ क्विंटल, सेलू तालुक्यातील १२ गावांमधील ५७ शेतकरी १५६८.९७ क्विंटल, समुद्रपूर तालुक्यातील १४ गावांमधील ३५ शेतकरी ४१३ क्विंटल, हिंगणघाट तालुक्यातील २१७ गावांमधील २०० शेतकरी ३५३६.३७ क्विंटल, आर्वी तालुक्यातील २०४ गावांमधील ५२ शेतकरी ४५७.२० क्विंटल तर आष्टी तालुक्यातील १२ गावांमधील ६२ शेतकरी २३१०.१० क्विंटल विविध प्रजातींच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. सदर बंदीच्या काळात याच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा हा नाशवंत शेतमाल (भाजीपाला) कुठलीही अडचण न येता नियमित बाजारपेठत पोहोचल्यास वर्धा जिल्ह्यात भाजीकोंडी होणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी कृषी विभागाकडून योग्य नियोजन करून त्यावर प्रभावी कार्यवाही होणेही गरजेचे आहे.भविष्यातील नियोजन गरजेचेकोरोनाविरुद्धची लढाई पुढील काही महिने सुरू राहील असे सांगण्यात येत आहे. याच काळात जीवनावश्यक वस्तू असलेल्या भाजीपाल्याची कोंडी वर्धा जिल्ह्यात होऊ नये म्हणून कृषी विभागाने आताच भविष्यातील संकट लक्षात घेऊन योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.या नाशवंत शेतमालाचे होतेय जिल्ह्यात उत्पादनजिल्ह्यात कांदा, नाममात्र स्वरूपात बटाटा, टमाटर, अद्रक, हिंरवी मिर्ची, गवार, वाल, पत्ताकोबी, फुलकोबी, पालक, मेथी, सांबार, वांगी, चवळी, भेंडी, ढेमस आदी भाजीपाल्याचे उत्पादन सध्या वर्धा जिल्ह्यात होत असल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.सद्यस्थितीत मुबलक प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन वर्धा जिल्ह्यात होत आहे. भविष्यात भाजीकोंडी होऊ नये म्हणून कृषी सहाय्यकांच्या मदतीने भाजीपाला उत्पादक व व्यापारी, अडते तसेच दलाल यांची साखळी तालुकास्तरावर करण्यात येत आहे. शिवाय प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कुणी कामात कुचराई करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी