शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

जय श्रीराम, भारत माता की जय, या घोषणा देऊन काय होणार? वरुण गांधींची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 2:41 PM

Varun Gandhi Criticize BJP: आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या वरुण गांधी यांनी आपल्याच पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा, सरकारी योजनांची परिस्थिती आणि भ्रष्टाचार आणि बेरोजगारीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

खासदार वरुण गांधी हे गेल्या काही वर्षांपासून भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील पीलिभीत येथील खासदार असलेले वरुण गांधी यांना भाजपा २०२४ च्या निवडणुकीत उमेदवारी देण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. त्याचदरम्यान, आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या वरुण गांधी यांनी आपल्याच पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा, सरकारी योजनांची परिस्थिती आणि भ्रष्टाचार आणि बेरोजगारीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

वरुण गांधी यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकांमुळे ते आता आपली वेगळी वाट चोखाळण्याच्या विचारात आहेत, असे संकेत मिळत आहेत. वरुण गांधी म्हणाले की, जे लोक कर्ज परतफेड करू शकणार नाही. त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जातील. त्यांच्या संपत्तीचा लिलाव होईल. आता मी विचारतो की, यावर उपाय काय आहे. केवळ घोषणा? जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणा देऊन काम भागणार आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. 

वरुण गांधी पुढे म्हणाले की, मी सुद्धा भारतमातेला मानतो. मी हनुमानजींचा भक्त आहे. भगवान राम यांना आपले आराध्य मानतो. आता मी तुम्हाला विचारतो की, आज ज्या काही पायाभूत सुविधा आहेत, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे. यावर तोडगा घोषणाबाजी करून होणार आहे की, धोरणात्मक सुधारणांमुळे होणा आहे, असा सवालही त्यांनी विचारला.  

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश