राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नायगाव : सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाºया नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजना सध्या कुचकामी ठरत आहे. कृत्रिम पाणी टंचाईमुळे महिलांना पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. ...
पेठ : तालुक्यातील मुरमट्टी गावाच्या ग्रामस्थांना वर्षानुवर्षे नदीच्या पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने नदीवर पूल व पक्का रस्ता करण्याची मागणी होत आहे. नदी गावाला वळसा घालून जात असल्याने पावसाळ्यात या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो. ...