देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण काँग्रेससाठी थोड अनुकूल होत असतानाच सर्जिकल स्ट्राईक झाले आणि काँग्रेस पुन्हा बॅकफूटवर गेली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र हे मान्य नाही. ...
बालकोट एअर स्ट्राईक हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले यावर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानात जाऊन किती दहशतवादी मारले याचा शोध घ्यावा असा टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला आहे. ...
लोकसभा निवडणूक जवळ आली असताना राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आला आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांमधील टीकाही वैयक्तिक पातळीवर पोहोचली आहे. ...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपसोबत जाण्यास नकार दिल्याने आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीका केली. विरोधी पक्षांमध्ये फूट पाडून काँग्रेस भाजपला मदत करत आहे तसेच काँग्रेसने भाजपसोबत छुपी युती केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. ...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दिक्षित यांनी फेटाळून लावली. ...
मध्यप्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भातील एका काँग्रेस नेत्याने प्रचारासाठी तब्बल दोन कोटी पाच लाख रुपयांचे बजेट दिले होते. या नेत्याचे हे अंदाजपत्रकच ‘लोकमत’च्या हाती लागले आहे. ...
भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला होता. मात्र आता या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवरून राजकारण सुरू झाले आहे. ...