शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शून्य उपयोग, लॉकडाऊनचा फटका शहरातील व्यापाऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 11:57 PM

लॉकडाऊनचा फटका शहरातील व्यापाºयांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. असे असतानाही शहरातील व्यापारी प्रशासनाला सातत्याने सहकार्य करीत आहेत.

- पंकज पाटील अंबरनाथ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून शहरातील व्यापाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. मात्र या निर्णयाचा कोणताही फायदा कोरोनाची संख्या कमी करण्यासाठी झालेला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान करून जे लॉकडाऊन राबविण्यात आले त्याचा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शून्य उपयोग झाला हेच समोर आले आहे. लॉकडाऊनचा फटका शहरातील व्यापाºयांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. असे असतानाही शहरातील व्यापारी प्रशासनाला सातत्याने सहकार्य करीत आहेत. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यावर रस्त्यांवर कोणीच दिसणार नाही याची काळजी घेणे गरजेचे होते.मात्र गेल्या तीन आठवड्यात प्रशासनामार्फत कडक लॉकडाऊन राबवण्यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना राबवली गेली नाही. केवळ दुकाने बंद ठेवून प्रशासन लॉकडाऊनचे यश शोधण्याच्या मागे लागले आहे.शहरातील रिक्षा आणि दुचाकीस्वार रस्त्यावर भटकत आहेत. नागरिकही विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमुळे शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कितपत यश येईल याची शाश्वती खुद्द प्रशासनही देऊ शकत नाही. शहरात लॉक डाऊन शिथिल झाल्यावर व्यापाºयांना एक दिवसाआड दुकान उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र त्याच काळात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले. असे असूनही रुग्णांच्या संख्येत वाढच झालेली आहे.शहराच्या हिताच्या दृष्टीने आम्ही प्रशासनाला प्रत्येकवेळी मदत केली आहे. आता प्रशासनाने व्यापाºयांच्या हिताचाही विचार करावा. शहरात व्यापाºयांना योग्य अटी आणि नियम घालून व्यवसाय करण्याची संधी द्यावी एवढीच माफक अपेक्षा आहे. २२ मार्चपासून ते १२ जुलैपर्यंत मोजक्या दिवसांत व्यापाºयांना व्यवसाय करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आता व्यापारी आपला तोटा किती सहन करणार, याचाही विचार करण्याची गरज आहे.- खानजी धल, अध्यक्ष,अंबरनाथ व्यापारी संघ

टॅग्स :thaneठाणे