शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा पारा जोरात तरी वऱ्हाडी जोषात

By admin | Updated: May 11, 2015 01:26 IST

यंदा संपुर्ण महाराष्ट्रात तापमानाने कमाल र्मयादा गाठली आहे. गेली पंधरा दिवसांपासून उष्मा जास्त वाढल्याने गरमी व उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.

उमेश जाधव, टिटवाळायंदा संपुर्ण महाराष्ट्रात तापमानाने कमाल र्मयादा गाठली आहे. गेली पंधरा दिवसांपासून उष्मा जास्त वाढल्याने गरमी व उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. असे असले तरी लग्नसराईत वर-वधुच्या हळदी समारंभ व मिरवणुकीत रात्रभर व दिवसा उन्हात डिजेच्या व बॅण्डच्या तालावर ताल धरत बेधुंद नाचणाऱ्या वऱ्हाडी मंडळीचे चित्र कल्याणच्या शहरी भागासह ग्रामीण भागात पहावयास मिळते. त्यामुळे निसर्गाच्या वातावरणातील बदलत्या उष्माघातावर मात करत वऱ्हाडी मंडळी बेधुंद होऊन नृत्य करून हाळदी व लग्न समारंभाचा आनंद लुटत आहेत.लग्नसमारंभ म्हटलं की वधु- वराकडच्या मंडळींची मोठी धावपळ सुरू आसते. यंदा लग्नकार्यासाठी मार्च महिन्यात फक्त ५ , एप्रिलमध्ये ४, मेमध्ये १० आणि जून महिन्यात अवघे ६ मुहूर्त आहेत, तेसुद्धा १२ जूनपर्यंत. पुढे १७ जूनपासून अधिक मास सुरू होत आहे. तेव्हा मार्च मिहना वगळता येत्या तीन महिन्यांत लग्नकार्यासाठी फक्त २० मुहूर्त आहेत. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या मुहूर्तांवर लग्नकार्य उरकण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू असल्याचे दिसते. अशा लग्न व हळदीसमारंभा करिता नातेवाईक अर्थात वऱ्हाडी आणि स्नेही हे आवर्जून आपली हजेरी लावत असतात. त्यामुळे हळदी व लग्नकार्यात आनंदाला उधाण आलेले असते. लग्नकार्यात इतर सर्व धार्मिक विधींसह हळदी समारंभाला विशेष महत्त्व असते. यावेळी रात्रभर डिजे व बँण्डच्या तालावर बेधुंद होऊन नाचण्याचा आनंद लुटणारी वऱ्हाडी मंडळी पहावयास मिळते.दुपारी १२ वाजेनंतरचा उन्हाचा तडाखा तर सहनच होत नाही. असे असले तरी कल्याणशहरासह ग्रामीण व संपूर्ण जिल्हयÞात अशा वातावरणात देखील गावागावात व शहरात सोसायटींमध्ये रोज शेकडो लग्न सोहळे साजरे होत आहेत या सोहळ्याच्या हाळदी समारंभात घामाघुम होऊन नाचणारी वऱ्हाडी पहावयास मिळते. या वऱ्हाडींपुढे तापमानाचाही पारा फिका पडला आहे की काय, अशी शंका निर्माण होते.