शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील कचरा ३५० मेट्रिक टनने घटला; वातावरणही झाले स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 01:39 IST

ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउनचा कालावधीही वाढविला आहे.

ठाणे : कोरोनास रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे वातावरणातही अनेक चांगले बदल होऊन प्रदूषणही कमी झाले आहे. ते होत असताना शहरात निर्माण होणाऱ्या कचºयातही मोठी घट झाली आहे. महापालिका हद्दीत लॉकडाउनआधी रोज ९६३ मेट्रिक टन कचरा निर्माण होत होता. परंतु, एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रतिदिन यात तब्बल ३५० मेट्रिक टन कचºयाची घट झाली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउनचा कालावधीही वाढविला आहे. संपूर्ण शहरच आता रेड झोनमध्ये आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांवरही त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे शहरात वाहनांचा वेग मंदावल्याने त्याचा चांगला परिणाम वातावरणात झाला असून प्रदूषणही कमी झाल्याचे दिसून आले आहे. तलाव, खाडीतील प्रदूषणातही घट झाली आहे. शिवाय, शहरात रोज निर्माण होणाºया कचºयावरदेखील परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

शहरात लॉकडाउन लागू होण्यापूर्वी प्रतिदिन ९६३ मेट्रिक टन विविध कचºयाची निर्मिती होत होती. परंतु, लॉकडाउन लागू झाल्यापासून या कचºयामध्येही घट झाली आहे. शहरात आता प्रतिदिन ३५० मेट्रिक टन कमी कचरा तयार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाणिज्यिक कचरा झाला सर्वात कमी सोसायटी, झोपडपट्टी भागातून कचरा कमी झालेला नाही. परंतु, कमर्शिअल ठिकाणांवरील कचरा कमी झाल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.शहरात अनेक ठिकाणी बाजार बंद झाले आहेत. भाजी मार्केट बंद आहेत. व्यावसायिक दुकाने, हॉटेल आदी बंद असल्याने त्यांचा कचरा तयार होत नाही. त्यामुळे कचºयाच्या निर्मितीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. शिवाय, बांधकाम साइटसह कंपन्याही बंद होत्या. यामध्ये सर्व प्रकारच्या कचºयाचा समावेश आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस