शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील आमदारांची मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग; मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 06:29 IST

ठाणे जिल्ह्याने नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

ठाणे : सध्या महाराष्ट्राचे राजकारण ठाणे जिल्ह्याभोवती फिरताना दिसत आहे. १८ आमदारांच्या या जिल्ह्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मात्र, अद्यापही खातेवाटपावरुन गुºहाळ सुरूच आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना आता या मंत्रिमंडळांत स्थान मिळणार का? याबाबत मात्र अनेक तर्कविर्तक लावले जात आहे. यासाठी काहींकडून जोरदार लॉबिंग सुरू असले तरी काहींच्या अपेक्षांना नाराजीचा सुरुंग लागणार असल्याचेच चित्र सध्या दिसत आहे.

ठाणे जिल्ह्याने नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. १८आमदारांच्या जिल्ह्यात सध्या ९ भाजप, ५ शिवसेना, २ राष्ट्रवादी, १ मनसे, समाजवादी १ अपक्ष आमदार आहेत. त्यानुसार आता शिवसेनेतील पाच पैकी एकनाथ शिंदे यांचे नाव सुरुवातीपासून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते.

परंतु, सर्वांच्या मर्जीखातीर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडेच मुख्यमंत्रीपद ठेवले आहे. त्यामुळे आता शिंदेच्या वाट्याला कोणते खाते येणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खातेवाटपावरून खलबते सुरू असल्याने महत्त्वाच्या खात्यांचीही अदलाबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिंदेच्या वाटेला कोणते खाते येणार याकडे लक्ष लागले आहे. तरीसुद्धा त्यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कायम राहिल, असे बोलले जात आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम, किंवा आरोग्य खातेही त्यांना मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे सर्वाधिक मतांनी निवडून येणारे आणि हॅट्रिक साधणारे प्रताप सरनाईक हेदेखील मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहेत. त्यांना कॅबिनेट नाही निदान राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. रवींद्र फाटक यांनीही आता मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जात आहेत, त्यामुळे फाटकांवर कृपा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचीही राज्यमंत्रीपद मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे.

तिकडे मुंब्रा - कळव्यातून सलग हॅट्रिक साधणारे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनाही कॅबिनेटमध्ये स्थान हवे आहे. सुरुवातीला त्यांना पालघरचे पालकमंत्रीपदी आणि कॅबिनेटमध्ये स्थान दिले जाईल, असे बोलले जात होते. मात्र आता नशीबात जे असेल ते मिळतेच, जे नसते ते मिळत नाही, अशी आव्हाड यांची पोस्ट सध्या फेसबुकवर फिरत आहे, त्यामुळे त्यांच्या नशीबात लाल दिव्याची गाडी आहे, किंवा नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील इतर आमदारांनी मात्र या सर्वांतून काहीशी माघार घेतल्याचेच दिसत आहे. असे असले तरी अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची आशा आहे.

टॅग्स :MNSमनसेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना