शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

ठाण्यातील आमदारांची मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग; मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 2:14 AM

ठाणे जिल्ह्याने नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

ठाणे : सध्या महाराष्ट्राचे राजकारण ठाणे जिल्ह्याभोवती फिरताना दिसत आहे. १८ आमदारांच्या या जिल्ह्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. मात्र, अद्यापही खातेवाटपावरुन गुºहाळ सुरूच आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना आता या मंत्रिमंडळांत स्थान मिळणार का? याबाबत मात्र अनेक तर्कविर्तक लावले जात आहे. यासाठी काहींकडून जोरदार लॉबिंग सुरू असले तरी काहींच्या अपेक्षांना नाराजीचा सुरुंग लागणार असल्याचेच चित्र सध्या दिसत आहे.

ठाणे जिल्ह्याने नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. १८आमदारांच्या जिल्ह्यात सध्या ९ भाजप, ५ शिवसेना, २ राष्ट्रवादी, १ मनसे, समाजवादी १ अपक्ष आमदार आहेत. त्यानुसार आता शिवसेनेतील पाच पैकी एकनाथ शिंदे यांचे नाव सुरुवातीपासून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते.

परंतु, सर्वांच्या मर्जीखातीर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडेच मुख्यमंत्रीपद ठेवले आहे. त्यामुळे आता शिंदेच्या वाट्याला कोणते खाते येणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खातेवाटपावरून खलबते सुरू असल्याने महत्त्वाच्या खात्यांचीही अदलाबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिंदेच्या वाटेला कोणते खाते येणार याकडे लक्ष लागले आहे. तरीसुद्धा त्यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कायम राहिल, असे बोलले जात आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम, किंवा आरोग्य खातेही त्यांना मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे सर्वाधिक मतांनी निवडून येणारे आणि हॅट्रिक साधणारे प्रताप सरनाईक हेदेखील मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहेत. त्यांना कॅबिनेट नाही निदान राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. रवींद्र फाटक यांनीही आता मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जात आहेत, त्यामुळे फाटकांवर कृपा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचीही राज्यमंत्रीपद मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे.

तिकडे मुंब्रा - कळव्यातून सलग हॅट्रिक साधणारे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनाही कॅबिनेटमध्ये स्थान हवे आहे. सुरुवातीला त्यांना पालघरचे पालकमंत्रीपदी आणि कॅबिनेटमध्ये स्थान दिले जाईल, असे बोलले जात होते. मात्र आता नशीबात जे असेल ते मिळतेच, जे नसते ते मिळत नाही, अशी आव्हाड यांची पोस्ट सध्या फेसबुकवर फिरत आहे, त्यामुळे त्यांच्या नशीबात लाल दिव्याची गाडी आहे, किंवा नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील इतर आमदारांनी मात्र या सर्वांतून काहीशी माघार घेतल्याचेच दिसत आहे. असे असले तरी अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची आशा आहे.

टॅग्स :MNSमनसेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना