ठाणे : शटडाऊन घेण्यात येणार असल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने जांभूळपाडा व शहाड जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा प्रत्येक शुक्रवारी सकाळी ९ ते शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.या कालावधीत कोलशेत, बाळकुम, वागळे इस्टेट, कळवा, विटावा, बेलापूर रोड व खारेगाव, मुंबई-पुणे रोड, मुंब्रा-कौसा या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}