शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या ठाण्याचा विकासाचा मार्ग अखेर मोकळा; शिवसेना अन् भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 14:35 IST

 ६ मीटरचा रस्ता होणार ९ मीटर, धोकादायक इमारतींचा पुनर्विकासाचा मार्गही मोकळा

ठाणे : ठाणे  शहरातील तब्बल २१ रस्ते ९ मीटरचे करण्याचा प्रस्ताव मंजुर होऊनही तो शासनाकडे पाठविण्यात आला होता. अखेर दोन वर्षानंतर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे आता येथील ६ मीटरचे रस्ते ९ मीटरचे होणार असून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्नही या निमित्ताने मार्गी लागला आहे. एकनाथ शिंदे यांचे खाते असलेल्या नगरविकास विभागाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे. परंतु आम्ही केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळेच नगरविकास विभागाला हा प्रस्ताव मंजुर करावा लागला असा दावा भाजपच्या वतीने आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

ठाणे  महापालिका क्षेत्रतील घोडबंदर, कळवा, मुंब्रा तसेच अन्य परिसरात मोठी गृहसंकुले उभी राहत असून यामुळे या भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. असे असले तरी ठाणो शहराचा मध्यवर्ती परिसर असलेल्या नौपाड्यातील जुन्या इमारतींचा मात्र पुर्नविकास रखडल्याचे चित्र आहे. इमारतीभोवती ९ मीटरचा रस्ता नसेल तर पुनर्विकासासाठी विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने नव्या टिडीआर धोरणात घेतली होती. या धोरणामुळे जुन्या ठाण्यातील ब्राह्मण सोसायटी, भास्कर कॉलनी, उथळसर, कोलबाड, विष्णूनगर, बी-कॅबीन, चरई आणि राबोडी या भागात सहा मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते आहेत. त्यामुळे या भागातील जुन्या इमारतींना टिडीआर मिळण्याचा मार्ग बंद झाल्याने त्यांचा पुनर्विकास गेल्या काही वर्षांपासून रखडला होता. या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी प्रशासनाने येथील २१ रस्ते ९ मीटरचे करण्याचा निर्णय घेतला होता.

महापालिका विकास आराखड्यात ९ मीटरचे रस्ते दर्शविण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव तयार केले होते. या प्रस्तावास महासभेने २०१८ रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर हरकती सुचना मागविण्यात आल्या होत्या. दरम्यान आता या प्रस्तावाला नगरविकास विभागाने हिरवा कंदील दाखविला असल्याची माहिती महापौर म्हस्के यांनी दिली. राज्यशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मागील कित्येक वर्षे रखडलेल्या येथील जुन्या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा होणार आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब करुन जुन्या ठाण्याच्या विकासाची वाट मोकळी करुन दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु आता शिवसेना आणि भाजपमध्ये या मंजुर झालेल्या प्रस्तावावरुन कलगीतुरा रंगला असून भाजपच्या मते आम्ही केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा प्रस्ताव मंजुर झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर आम्हीच हा प्रस्ताव तयार केला आम्ही तो मंजुर करुन घेतल्याचा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

सत्ताधाऱ्यांना जुन्या ठाण्याचा पुनर्विकास नको होता - संजय केळकर

जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासाचा हा प्रस्ताव काही महिने महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी आपल्याकडेच ठेवला होता. भाजपच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर आता हा प्रस्ताव शासनाने मंजुर केला आहे. सचिवांबरोबर तीन वेळा मिटींगसुध्दा घेतल्या होत्या. सत्ताधाऱ्यांना हा प्रस्ताव मंजुर करायचा नव्हता, त्यांना जुन्या ठाण्याचा पुनर्विकास करायचा नव्हता. परंतु आम्ही सतत पाठपुरावा केल्यानेच नगरविकास विभागाला हा निर्णय घेणो भाग पडले आहे. (संजय केळकर - आमदार, भाजप)

दुसऱ्याच्या मुलाला बाप म्हणून स्वत:चे नाव लावण्याचा प्रयत्न करु नये - नरेश म्हस्के

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि नगरविकास खाते त्यांचेकडे होते, तेव्हा त्यांनी याला का मंजुरी दिली नाही, याचे उत्तर भाजपने आधी द्यावे. प्रस्ताव तयार झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांमुळेच हा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविण्यास उशिर झाला होता. हा रस्ता नको तो रस्ता घ्या, असे त्यांचे नगरसेवकच सांगत होते. परंतु भाजपला केवळ फुकटचे श्रेय घ्यायचे असते. आम्ही हा प्रस्ताव तयार केला, आम्ही तो राज्यशासनाकडे पाठविला आम्हीच तो मंजुर करुन घेतला. त्यामुळे दुसऱ्याच्या मुलाला स्वत:चा बाप म्हणून नाव लावण्याचा प्रयत्न करु नये. (नरेश म्हस्के - महापौर, ठामपा)

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा