शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ऐन श्रावणात कांदा वधारला...

By admin | Updated: August 18, 2015 23:15 IST

श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण खाणे वर्ज्य असले तरीही याच महिन्यात कांदा कडाडला आहे. भाव वधारल्यामुळे त्याने सर्वसामान्यांनाही रडवले आहे

ठाणे : श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण खाणे वर्ज्य असले तरीही याच महिन्यात कांदा कडाडला आहे. भाव वधारल्यामुळे त्याने सर्वसामान्यांनाही रडवले आहे. यंदा अवकाळी पाऊस तसेच गारपीटी यांसारख्या नैसर्गिक संकटामुळे कांद्याचे उत्पादन घटले असून भाव गगनाला भिडले आहेत. तर साठवणुकीमुळे कांद्याचे भाव वधारल्याचे आरोप किरकोळ व घाऊक विक्रेत्यांकडून होत आहेत. मात्र शेतकरी व व्यापाऱ्यांकडेच माल नसल्याने कांदे महागल्याचे लासलगाव बाजार समितीचे सदस्य जयदत्त होळकर यांनी सांगितले.आशियातील कांद्यांची सगळ्यात मोठी मार्केट यार्ड लासलगावात आहे. लासलगाव यार्डावर ४५०० क्विंटलने माल विकला जात आहे. म्हणजेच किरकोळ व घाऊक बाजारात ५०-६० रुपये किलो रुपयाने कांदा मिळत आहे. मुळातच माल कमी असल्याने भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांकडे असणारा कांदा हा पावसापाण्याने ओला झाल्याने सडला आहे. तर पावसाळी वातावरणात कांद्याचा साठा करणे शेतकरी व व्यापाऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे साठेबाजीमुळे कांदा महागला, ही ओरड चुकीची आहे, असेही होळकर यांनी स्पष्ट केले. कांद्याच्या महागाईला लगाम घालण्यासाठी पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका आदी देशांतून कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी हा कांदा प्रत्यक्ष ग्राहकांच्या हाती येण्यास पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो. तोपर्यंत तो सडून जातो, असा आजवरचा अनुभव आहे.