शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बिल न भरल्याने अत्यावश्यक सेवांचे मोबाईल ‘नॉट रिचेबल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, स्वर्गरथ, जनाजा यांचे मोबाईल नंबर गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, स्वर्गरथ, जनाजा यांचे मोबाईल नंबर गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अत्यावश्यक सेवेच्या मोबाईलची बिले भरली नसल्याने हा प्रकार झाला. वाहन व्यवस्थापक यशवंत सगळे यांनी सोमवारी अत्यावश्यक सेवेतील मोबाईल सुरू झाल्याची माहिती दिली.

उल्हासनगर महापालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी ३ रुग्णवाहिका, ४ स्वर्गरथ व २ जनाजा तैनात केले असून या अत्यावश्यक सुविधा त्वरित उपलब्ध होण्यासाठी व्हॅन व रुग्णवाहिकेचे मोबाईल नंबर जाहीर करण्यात आले आहेत. नागरिकांनी या मोबाईलवर संपर्क साधला की, काही मिनिटांत महापालिका सेवा उपलब्ध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अत्यावश्यक सेवेतील मोबाईल नॉट रिचेबल असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिकेने अत्यावश्यक सेवेतील मोबाईल बिले भरली नसल्याने हा प्रकार झाल्याची माहिती उघड झाली. याबाबतची माहिती मनसेचे शहर संघटक मेनुद्दीन शेख यांना मिळाल्यावर त्यांनी संबंधितावर कारवाईची मागणी केली.

महापालिकेवर शिवसेना मित्रपक्षांची सत्ता असून पालिका अत्यावश्यक सुविधेचे मोबाईल सुरू ठेवत नसल्याने सर्वस्तरातून टीका होत आहे. दुसरीकडे शहर विकासासाठी कोट्यवधींचा निधी शासनाकडून आणल्याचे शिवसेना सांगत आहे. करोडोंचा विकास निधी आणल्याच्या फुशारक्या मारणाऱ्या शिवसेनेने रुग्णवाहिका, स्वर्गरथ व जनाजासाठी दिलेली अत्यावश्यक मोबाईल सेवा २४ तास सुरू ठेवावी असे सर्वस्तरातून बोलले जात आहे. असेच प्रकार सुरू राहिल्यास भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेने दिला.