शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात महायुतीचाच बोलबाला; शिंदे, सरनाईकांनी राखला बालेकिल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 17:48 IST

Maharashtra Election Result 2019 : ठाण्यातील चारही मतदारसंघात विद्यमान आमदारांचा विजय झाला आहे. 

ठाणे - ठाण्याच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. ठाण्यातील चारही मतदारसंघात विद्यमान आमदारांचा विजय झाला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघावर पुन्हा एकदा शिवसेनेने आपल्या विजयाची मोहोर उमटवली आहे. शिंदे यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. ओवळा माजीवडा मतदार संघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक, कळवा-मुंब्रा येथून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड तर ठाणे शहरमधून भाजपाचे संजय केळकर विजयी झाले आहेत. 

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांमध्ये आघाडी घेत आपला गड कायम राखला आहे. शिंदे यांनी 1 लाख 13 हजार 4 मते मिळवून विजयाची हॅटट्रिक साधली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणेच एकतर्फी निकाल लागल्यामुळे पुन्हा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघावर भगवा फडकविला आहे. या मतदार संघात काँग्रेसचे संजय घाडीगावकर आणि मनसेचे महेश कदम यानी शिंदे यांना आव्हान दिले होते. हे त्यात घाडीगावकर यांनी प्रचारात क्लस्टरचा मुद्दा घेऊन शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो अपयशी ठरल्याचे या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांचा पराभव केला आहे. ओवळा माजीवडा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांना 1,17, 289 मतदारांनी मतांच्या रुपात मतदान केले. त्यांनी काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा 83,772 मतांनी पराभव करत, विजयाची हॅटट्रिक साधली. सुरुवातीपासूनच सरनाईकांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत, त्यांनी आपला गड राखला. या विजेयाचे श्रेय त्यांनी मतदारसंघातील शिवसैनिकांना दिले.

सक्षम विरोधी पक्ष म्हणून संधी द्या, असं आवाहन करणाऱ्या मनसेला केवळ एका जागेवर यश मिळालं आहे. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेच्या राजू पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेना आणि मनसेमध्ये चुरशीचा संघर्ष पाहायला मिळाला. अखेर यामध्ये राजू पाटील यांनी बाजी मारली आणि मनसेला भोपळा फोडण्यात यश आलं. सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच राजू पाटील यांनी आघाडी घेतली होती. शिवसेनेच्या रमेश म्हात्रेंनी त्यांना कडवी टक्कर दिली. अनेकदा राजू पाटील आणि रमेश म्हात्रे यांच्या मतांमध्ये अवघ्या काही शे मतांचा फरक दिसत होता. अखेर राजू पाटील यांनी बाजी मारली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मनसेनं पहिल्या विजयाची नोंद केली. मनसेला कल्याण ग्रामीणमध्ये यश मिळेल, अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती.

भाजपा

मंदा म्हात्रे ( बेलापूर )

गणेश नाईक ( ऐरोली )

संजय केळकर ( ठाणे शहर )

गणपत गायकवाड़ ( कल्याण पूर्व )

महेश चौगुले ( भिवंडी पश्चिम )

किसन कथोरे ( मुरबाड )

रविंद्र चव्हाण ( डोंबिवली )

कुमार आयलानी ( उल्हासनगर )

शिवसेना

एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखडी )

प्रताप सरनाईक ( ओवला माजीवडा )

शांताराम मोरे ( भिवंडी ग्रामीण )

विश्वनाथ भोईर ( कल्याण पश्चिम )

बालाजी किनिकर ( अंबरनाथ )

राष्ट्रवादी

जितेंद्र आव्हाड ( कळवा-मुंब्रा )

दौलत दरोडा (शहापूर )

मनसे

प्रमोद पाटील ( कल्याण ग्रामीण )

समाजवादी

रहिस शेख ( भिवंडी पूर्व )

अपक्ष

गीता जैन ( मीरा भाईंदर )

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thaneठाणेkopri-pachpakhadi-acकोपरी-पाचपाखाडीkalyan-rural-acकल्याण ग्रामीणmumbra-kalwa-acमुंब्रा कळवाbelapur-acबेलापूरBJPभाजपाShiv Senaशिवसेना