शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
2
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
3
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
4
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
5
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
6
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
7
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
8
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
9
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
10
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
12
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
13
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
15
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
16
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
17
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : आधी पाणी द्या, नंतर मत मागा, डोंबिवलीच्या देसलेपाड्यात बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 02:15 IST

निवडणूक म्हटले की, नागरी समस्यांवर चर्चा आलीच. कल्याण ग्रामीण मतदारसंघात असलेल्या डोंबिवलीनजीकच्या देसलेपाड्यातील एका सोसायटीने पाण्याच्या समस्येबाबत लावलेले बॅनर सध्या चर्चेत आहे.

कल्याण : निवडणूक म्हटले की, नागरी समस्यांवर चर्चा आलीच. कल्याण ग्रामीण मतदारसंघात असलेल्या डोंबिवलीनजीकच्या देसलेपाड्यातील एका सोसायटीने पाण्याच्या समस्येबाबत लावलेले बॅनर सध्या चर्चेत आहे. आधी पाणी द्या, नंतर मत मागा, अशा आशयाचा हा बॅनर लावून, या सोसायटीने आपल्या पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

देसलेपाडा येथील भद्रानगर गृहनिर्माण सोसायटीत १२८ सदनिका आहेत. या सदनिकाधारकांकडून मार्च २०१९ पर्यंत पाण्याचे बिल कल्याण-डोंबिवली महापालिकेस भरण्यात आले आहे. पाण्याचे बिल भरले जाते. मात्र, सोसायटीच्या नळांमध्ये पाणीच येत नाही. त्यामुळे सोसायटीकडून खाजगी आणि महापालिकेचा पाणीटँकर मागवला जातो. खाजगी टँकरला १६०० रुपये तर महापालिकेच्या टँकरला ४०० रुपये मोजावे लागतात. महापालिकेकडून मोजकेच टँकर दिले जातात. टंचाईग्रस्त भागाला मोफत पाणी दिले जाणे आवश्यक आहे. महापालिकेचे पाणीबिल भरूनदेखील सोसायटीला पाण्याच्या टँकरपोटी महिन्याला ५० हजार रुपयांचा खर्च येतो.

टँकरचे पाणी पिण्यासाठी योग्य नसते. त्यामुळे पिण्याकरिता सदनिकाधारकांना पाण्याचा बाटला खरेदी करावा लागतो. पाच लीटर पाण्याचा एक बाटलासाठी ७० रुपये मोजावे लागतात. ज्यांच्या घरात जास्त सदस्य आहे, त्यांना १५ लीटरचा पाण्याचा बाटला खरेदी करावा लागतो. टँकरव्यतिरिक्त शुद्ध पाणीखरेदीचा खर्च वेगळा होतो. पाण्याची समस्या केवळ सोसायटीपुरतीच मर्यादित नाही. देसलेपाड्यात सर्वत्र हीच परिस्थिती आहे.

सोसायटीने पाण्यासाठी सर्वांकडे पाठपुरावा केला. मात्र, समस्या न सुटल्याने त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली होती. पाणीसमस्या सोडविण्याचे आश्वासन प्रत्येकाकडून दिले जात आहे. प्रत्यक्षात समस्या जैसे थे आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही पाणीसमस्या सोडवण्याचे आश्वासन दिले गेले. ही निवडणूक पार पडून चार महिने उलटले, तरी आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. अखेरीस सोसायटीने आधी पाणी द्या, नंतर मते मागा, असा सज्जड इशाराच विधानसभा निवडणुकीसाठी मते मागण्याकरिता येणाऱ्या उमेदवारांना दिला आहे.

हा इशारा पाहता जे सत्तेत नव्हते, ते मते मागण्यासाठी येतील. त्यांच्याकडून हा मुद्दा प्रकर्षाने उचलला जाईल. प्रत्यक्षात हा भाग कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्या मतदारसंघात येतो. शिवसेनेने त्यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे.

या समस्येबाबत भोईर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी बोलणे झालेले आहे. देसलेपाडा हा २७ गावे परिसरात येतो. या भागाला एमआयडीसी पाणीपुरवठा करते. आयुक्त व एमआयडीसी यांच्याशी बोलून सोसायटीच्या पाण्याची समस्या सोडविली जाईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019dombivali-acडोंबिवली