शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्य्या रुग्ण संख्येत वाढ; दिवसभरात ७४६ रुग्ण, तिघांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 21:56 IST

अंबरनाथमध्ये १३ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ हजार असून मृत्यू ३१५ आहेत

ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.  शनिवारी दिवसभरात ७४६ रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ६९ हजार ६५ रुग्णांची नोंद झाली. तर जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार २९९ झाली आहे.  
 
ठाणे शहरात २२०  रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६३ हजार ४९६ झाली आहे. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४०० झाली. कल्याण - डोंबिवलीत २१० रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. आता ६४ हजार ३८६ रुग्ण बाधीत असून एक हजार २०७  मृत्यूची नोंंद आहे. उल्हासनगरमध्ये ९ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ९५७ झाली. तर, ३७२ मृतांची नोंद आहे. भिवंडीला सात बाधीतसह एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ८३१ असून मृतांची संख्या ३५५ आहे. मीरा भाईंदरमध्ये ६४ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या २७ हजार ४३५ असून मृतांची संख्या ८०४ आहे.

अंबरनाथमध्ये १३ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ हजार असून मृत्यू ३१५ आहेत. बदलापूरमध्ये ४० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १० हजार १२५ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू  नसल्यामुळे मृत्यूची संख्या १२७ कायम आहे. ग्रामीणमध्ये २१ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही.आता बाधीत १९ हजार ६७३ आणि आतापर्यंत ५९७ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस