शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्य्या रुग्ण संख्येत वाढ; दिवसभरात ७४६ रुग्ण, तिघांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 9:56 PM

अंबरनाथमध्ये १३ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ हजार असून मृत्यू ३१५ आहेत

ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.  शनिवारी दिवसभरात ७४६ रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ६९ हजार ६५ रुग्णांची नोंद झाली. तर जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार २९९ झाली आहे.   ठाणे शहरात २२०  रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६३ हजार ४९६ झाली आहे. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४०० झाली. कल्याण - डोंबिवलीत २१० रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. आता ६४ हजार ३८६ रुग्ण बाधीत असून एक हजार २०७  मृत्यूची नोंंद आहे. उल्हासनगरमध्ये ९ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ९५७ झाली. तर, ३७२ मृतांची नोंद आहे. भिवंडीला सात बाधीतसह एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ८३१ असून मृतांची संख्या ३५५ आहे. मीरा भाईंदरमध्ये ६४ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या २७ हजार ४३५ असून मृतांची संख्या ८०४ आहे.

अंबरनाथमध्ये १३ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ हजार असून मृत्यू ३१५ आहेत. बदलापूरमध्ये ४० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १० हजार १२५ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू  नसल्यामुळे मृत्यूची संख्या १२७ कायम आहे. ग्रामीणमध्ये २१ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही.आता बाधीत १९ हजार ६७३ आणि आतापर्यंत ५९७ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस