ICSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ठाण्याच्या किमया बवुआला १०० पैकी १००
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 22:25 IST2026-04-30T22:25:26+5:302026-04-30T22:25:26+5:30
आपल्या यशाचे रहस्य सांगताना किमया म्हणाली, “मी दररोज सहा ते आठ तास अभ्यास केला. सुरुवातीपासूनच कठीण विषयांवर अधिक लक्ष केंद्रित केले आणि नियमित सराव केला. त्यामुळेच हे यश मिळवता आले.”

ICSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ठाण्याच्या किमया बवुआला १०० पैकी १००
ठाणे : ICSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत ठाण्याच्या किमया बवुआ हिने विज्ञान शाखेत १०० पैकी १०० गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला. तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. किमयाने दहावीच्या परीक्षेतही उल्लेखनीय यश मिळवले होते. त्या यशातून प्रेरणा घेत तिने बारावीच्या परीक्षेसाठी नियोजनबद्ध तयारी केली. दहावीपेक्षा अधिक गुण मिळवण्याचे स्वतःलाच दिलेले आव्हान तिने यशस्वीरीत्या पूर्ण केले.
आपल्या यशाचे रहस्य सांगताना किमया म्हणाली, “मी दररोज सहा ते आठ तास अभ्यास केला. सुरुवातीपासूनच कठीण विषयांवर अधिक लक्ष केंद्रित केले आणि नियमित सराव केला. त्यामुळेच हे यश मिळवता आले.” तिने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय आणि शिक्षकांना दिले. “अभ्यासाचे योग्य नियोजन आणि सातत्य ठेवले, तर यश निश्चित मिळते,” असा संदेशही किमयाने विद्यार्थ्यांना दिला.
किमयाच्या या यशामुळे ठाण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे. तिचे वडील मयूर बवुआ यांनी आनंद व्यक्त करत सांगितले, “खूप छान वाटत आहे. किमया नेहमीच मेहनत करत आली आहे. तिला मिळालेले गुण तिच्या मेहनतीचे फळ आहे. आम्हाला तिचा अभिमान आहे. कुटुंबातील सर्वजण आनंदी आहेत. पुढे ती बिझनेस क्षेत्रात प्रवेश घेणार आहे.” ती सुलक्षणा देवी सिंघानिया शाळेची विद्यार्थिनी असल्याचे त्यांनी सांगितले.