शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या इच्छुकांच्या पदरी जिल्ह्यात निराशा?; एकाच जिल्ह्यात किती जणांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 00:04 IST

अनेकांना करावी लागणार तडजोड

ठाणे : मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाची खाती मिळावी याकरिता शिवसेनेचा हट्ट कायम असल्याने जिल्ह्यात भाजपची ताकद वाढलेली असतानाही भाजपमधील काही नवनिर्वाचित आमदारांना मंत्रिमंडळाच्या बाहेर राहावे लागू शकते, अशी दाट शक्यता आहे.

भाजपने २६ खाती आपल्याकडे ठेवताना शिवसेनेला १३ खाती देण्याचा प्राथमिक प्रस्ताव दिला आहे. परंतु, वाटाघाटींमध्ये ही संख्या १८ पर्यंत खेचण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू आहे. भाजपने आयारामांना घेतल्याने व त्यांना विविध पदांचे आश्वासन दिले असल्याने ते पाळण्यासाठी भाजपची कसरत सुरू झाली आहे. अशातच पक्षातील इतरांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

मागील सरकारमध्ये भाजपच्या काही मंत्र्यांकडे तीन ते चार खाती होती. विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भाजपच पुन्हा एकदा मोठा तर शिवसेना छोटा भाऊ ठरला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळात आपल्याला स्थान प्राप्त व्हावे, अशी भाजपच्या आमदारांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. मात्र सत्तेकरिता शिवसेनेची भाजपला गरज आहे हे हेरून भाजपने अनेक महत्त्वाच्या खात्यांचा आग्रह धरला आहे. वाटाघाटीत शिवसेना सरस ठरली तर सेनेला साथ देणाऱ्या मुंबई व ठाण्यातील दोन किंवा तीन टर्म विजयी होणाऱ्यांना मंत्रिमंडळात सेना संधी देईल. साहजिकच युतीच्या सरकारमध्ये मोठा भाऊ या नात्याने प्रादेशिक, जातीय व अन्य समतोल साधणे ही जबाबदारी भाजपची असेल. एकाच जिल्ह्याला चार-पाच मंत्रिपदे दिली तर त्यामुळे अन्य जिल्ह्यांत त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते.गणेश नाईक यांना बाहेर ठेवणे भाजपला अशक्यगणेश नाईक यांना भाजपने अलीकडेच पक्षात घेतले. नाईक यांच्याकडे मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीला बाहेर ठेवणे भाजपकरिता अशक्य आहे. अर्थात नाईक यांच्याकरिता भाजपने बेलापूर विधानसभा मतदारसंघ सोडला नव्हता. त्यामुळे ऐरोलीतून पुत्र संदीप याला माघार घ्यावी लागली होती. जिल्ह्यातील भाजपचे मूळ नेते व राष्ट्रवादीतून २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले काही आमदार यांचा नाईक यांना संधी देण्यास व त्यांचे महत्त्व वाढवण्यास विरोध आहे. त्यांनी दबाव टाकला तर नाईक यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले जाऊ शकते. रवींद्र चव्हाण हे राज्यमंत्री होते. यावेळी त्यांची कॅबिनेट मंत्री होण्याची इच्छा असल्याचे बोलले जाते. मात्र शिवसेनेला वन, गृहनिर्माण, ग्रामविकास अशी काही खाती गेली तर चव्हाण यांचे कॅबिनेट मंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यात अडथळे येऊ शकतात. भाजपकडे नगरविकास, गृह आदी खात्यांशी संबंधित राज्यमंत्रिपदे शिवसेनेकडे गेल्यास राज्यमंत्रिपदावरील भाजप आमदारांना कमी महत्त्वाची खाती मिळतील.किसन कथोरे हे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा मंत्रिपदावरील दावा बळकट आहे. कथोरे यांचा शहरी विभागाशी संबंध असून ते प्रतिनिधित्व आदिवासी लोकसंख्या असलेल्या भागाचे करतात. मात्र कथोरे हे ज्येष्ठ नेते असून त्यांना त्यांच्या तोलामोलाचे खाते अपेक्षित असताना सेनेसोबत सुरू असलेल्या रस्सीखेचीत त्यांच्या पदरात काय पडते, याबाबत उत्सुकता आहे.संजय केळकर यांनी ठाणे हा एकेकाळी शहरातील मध्यवर्ती भागातील शिवसेनेचा गड दुसºयांदा जिंकला आहे. सेनेला शह देण्याकरिता केळकर यांचा मंत्रिपदाकरिता विचार केला जाऊ शकतो. मात्र मुख्यमंत्री ब्राह्मण असताना मंत्रिमंडळात आणखी एक ब्राह्मण चेहरा सामावून घेतला जाईल किंवा कसे, याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत.

टॅग्स :BJPभाजपा