शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कर्जाच्या विवंचनेतून जिगरबाज दोघींना गवसली आत्मनिर्भरतेची दिशा; कथा रेखा आणि प्रज्ञाच्या चिकाटीची

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 12:58 AM

अवघ्या २०० रुपयांतून खर्च भागविणे शक्य नसल्याने त्यांनी मंगळवारपासून सकाळी ७ ते सकाळी १० वाजेपर्यंत नाक्यांवर जाऊन पोहे, चहा विकण्याचे काम सुरू केले आहे. घरातून निघतानाच त्या पोहे आणि चहा बनवून निघतात.

ठाणे : लॉकडाऊनच्या काळात पतीचा मृत्यू झाल्यानंतर फायनान्स कंपनीने कर्जफेड करण्यासाठी लावलेल्या तगाद्यामुळे विवंचनेत सापडलेल्या दोन महिला परिस्थितीशी दोन हात करुन आत्मनिर्भर  झाल्या. दोन मुलांचे पोट भरून या दोघी रिक्षाचे कर्ज फेडत आहेत. सरकारने बँका आणि फायनान्स कंपन्यांना लॉकडाऊनच्या काळात हप्ते न घेण्याचे निर्देश दिलेले असतानाही बँकांची कर्जवसुली सुरूच आहे. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी दिव्यात राहणाऱ्या रेखा पाटील नऊ तास रिक्षा चालवतात. याशिवाय सकाळच्या वेळेत तीनचार तास नाक्यानाक्यांवर रिक्षा उभी करून चहा-नाश्ता विकण्याचे कामदेखील त्यांनी सुरू केले. प्रज्ञा साळुंखे यांनीदेखील रिक्षा चालवून चहा-नाश्ता विक्री करण्याचे काम सुरू केले आहे.

रेखा पाटील यांना दोन मुले आहेत. एक दहावी आणि दुसरा बारावीत आहे. त्यांचे पती राजेंद्र एका खासगी कंपनीत कामाला होते. लॉकडाऊनमध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्व जबाबदारी रेखाच्या खांद्यावर आली. पतीच्या पगारात घरखर्च भागत नव्हता म्हणून त्यांनी त्यांच्या हयातीतच कर्ज काढून अबोली रिक्षा घेतली. आधी सर्व व्यवस्थित सुरू होते. मात्र, पतीचे हृदयविकाराने निधन झाल्यामुळे त्यांची रिक्षा पाचसहा महिने बंद ठेवावी लागली. आता दोन महिन्यांपासून ती सुरू केली असली, तरी दिवसाला फक्त २००-३०० रुपयेच कमाई होत आहे. त्यातून घरात किती खर्च करायचे? बँकेचे हप्ते कसे भरायचे? मुलांची फी कशी द्यायची? गाडीचा मेंटेनन्स कसा ठेवायचा आणि आरटीओच्या कारवाईला कसे सामोरे जायचे? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. त्यातच, फायनान्स कंपनीकडून कर्जाच्या हप्त्यांसाठी वारंवार अपमानित करणारे फोन येत आहेत. या थकलेल्या हप्त्यांवर चक्रवाढ व्याज लावले आहे. त्याचे १५ हजार ४०४ रुपये झाले आहेत. त्यामुळे दंड भरायचा की हप्ते भरायचे, असे संकट त्यांच्यासमोर आहे. अवघ्या २०० रुपयांतून खर्च भागविणे शक्य नसल्याने त्यांनी मंगळवारपासून सकाळी ७ ते सकाळी १० वाजेपर्यंत नाक्यांवर जाऊन पोहे, चहा विकण्याचे काम सुरू केले आहे. घरातून निघतानाच त्या पोहे आणि चहा बनवून निघतात.

अशीच परिस्थिती नितीन कंपनी परिसरात राहणाऱ्या प्रज्ञा साळुंके यांची आहे. पती सुनील कर्करोगाने त्रस्त असल्याने ते घरीच असतात. त्यांचा मुलगा बारावीत शिकतोय. घराची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आहे. कोरोनामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कर्ज काढून रिक्षा घेतली असल्याने बँकेकडून होणारा त्रास सहन न झाल्याने स्वत:चे सगळे दागिने विकून त्यांनी रिक्षाचे हप्ते फेडले. आता रिक्षाच्या कमाईतून घरखर्च, पतीचे औषधोपचार आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च झेपेनासा झाल्याने त्यांनीसुद्धा रेखासोबत नाश्ता विकायला सुरुवात केली. दोघीही सकाळी रिक्षा घेऊन बाहेर पडतात. रिक्षास्टॅण्ड आणि नाक्यांवर रिक्षा उभ्या करून नाश्ता विकतात. त्यातून मिळणारा नफा दोघी वाटून घेतात. मंगळवारी त्यांना यात नफा झाला नाही, पण बुधवारी २०० रुपयांची कमाई झाली, असे त्या दोघींनी सांगितले.

कर्जाचे सर्व हप्ते भरण्यास तयार आहे. पण, कमाईच होत नाही. लॉकडाऊनच्या काळात थकलेल्या हप्त्यांवर व्याज-दंड लावला आहे. इतर खर्च भागवून तो आणि हप्ते कसे भरायचे? पती होते तेव्हा आधार होता. बँकेकडून हप्त्यांसाठी वाईट संभाषणाचे फोन येतात. गाडी चालवत असताना फोन कट केला, तर वाईट मेसेज पाठवितात. कोरोना काळातील सगळे हप्ते सर्व व्यवहार सुरळीत झाल्यानंतर वसूल करावेत. आरटीओनेदेखील आमच्या गाडीच्या पासिंगची फी माफ करावी.- रेखा पाटील, रिक्षाचालक

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा