शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागाशिवाय समस्या सुटणे कठीण

By admin | Updated: June 29, 2017 02:44 IST

केडीएमसी हद्दीतील नागरी समस्या सोडवण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी जनतेच्या सहभागाशिवाय या समस्या सुटणे अशक्य आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : केडीएमसी हद्दीतील नागरी समस्या सोडवण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी जनतेच्या सहभागाशिवाय या समस्या सुटणे अशक्य आहे. त्यामुळे महापालिकेच्या उपक्रमांमध्ये त्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी येथील ‘दिलखुलास संवाद’ कार्यक्रमात केले. कल्याण-डोंबिवली पत्रकार संघातर्फे मंगळवारी हा कार्यक्रम झाला. या वेळी महापौरांनी पत्रकार आणि उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शहरातील विविध समस्या आणि भविष्यातील योजना याबाबत आपले विचार मांडले. सध्या शहरात भेडसावणारा डम्पिंगचा प्रश्न असो अथवा फेरीवाला अतिक्रमणाचा विषय, याबाबत बोलताना महापौरांनी या समस्या निकाली काढण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेची आर्थिक स्थिती आणि उपलब्ध असलेले मनुष्यबळ यात आमचे प्रयत्न अपुरे पडत असतील. मात्र, आमचा प्रयत्न सुरूच राहील. परंतु, नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेणे काळाची गरज असल्याचे देवळेकर म्हणाले.आम्ही फेरीवाल्यांविरोधात कारवाई करतो. परंतु, ज्या वेळी नागरिक त्यांच्याकडून वस्तू खरेदी करणे थांबवतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने या समस्येला आळा बसू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तम आरोग्यसेवा, चांगली उद्याने, करमणूक आणि मनोरंजनाच्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘स्मार्ट सिटी’द्वारे सकारात्मक बदल झालेले पाहावयास मिळतील, असा दावाही त्यांनी केला. २७ गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. मात्र, सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही नागरी सुविधा तेथील विकास प्रकल्पांची सांगड घालून तेथील नागरिकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आहे. कल्याणची ऐतिहासिक परंपरा जोपासण्यासाठी दुर्गाडी किल्ल्याचे जतन करण्याबरोबरच लवकरच आरमार स्मारक उभारले जाईल. तसेच आरमार दिन साजरा करण्याची घोषणाही महापौरांनी केली.